जेजुरीकर जिंकले! मार्तंड देवस्थान विश्वस्तांबद्दल धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Jejuri trustee controversy : charity commissioner new decision, now 11 members will have appointed on martand devasthan samiti.
Jejuri trustee controversy : charity commissioner new decision, now 11 members will have appointed on martand devasthan samiti.
social share
google news

Jejuri Trustee Controversy : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची जेजुरी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मार्तंड देवस्थान समितीवर नेमण्यात आलेल्या विश्वस्तांवरून हा वाद सुरू झाला. जेजुरीकर धर्मादाय आयुक्तालयाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले. जेजुरीकरांच्या ठाम निश्चयासमोर आता धर्मादाय आयुक्तांना मोठा निर्णय घ्यावा लागला, ज्यामुळे जेजुरीकरांचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे.

मागील 13 दिवसांपासून जेजुरीतील ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या नियुक्तीला विरोध केला. नागरिकांसह सामाजिक संघटनांनी या निर्णयाविरोधात वेगवेगळी आंदोलने आणि मोर्चातून मागणीकडे लक्ष वेधून घेतले. जेजुरीकरांकडून सुरू असलेल्या या आंदोलनाची अखेर दखल घ्यावी लागली आहे.

Video >> कोल्हापूर हिंसाचारावर कोण काय म्हटलं? शरद पवार, देवेंद्र फडणवीस आमनेसामने

मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याऐवजी धर्मादाय आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळातील सदस्यांची संख्या आता 7 वरून 11 करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे 11 विश्वस्त नियुक्त केले जाणार आहे. यापैकी 6 विश्वस्त हे जेजुरीतील असणार आहे, तर 5 जेजुरीबाहेरील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फेरविचार याचिकेवर सुनावणी

बाहेरील विश्वस्तांच्या निवडी केल्याने नाराज झालेल्या ग्रामस्थांनी जेजुरीत विविध प्रकारच्या आंदोलने केली होती तसेच धर्मदायुक्तांकडे बाबत पुनर्विचार याचिका दाखल केली होती त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. झालेल्या निर्णयानुसार आता 7 ऐवजी 11 विश्वस्तांची निवड करून तिढा अखेर सोडवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Video >> आधी ओढणीने तिचा खून केला, नंतर रेल्वेखाली जाऊन त्याने आत्महत्या केली

धर्मादाय आयुक्तांनी आज सुनावणीनंतर हा निकाल दिला. घटनेत दुरुस्ती केल्यानंतर सोमवारी अंतिम सुनावणी होणार आहे. मात्र, आयुक्तांच्या निर्णयामुळे जेजुरीकरांचे आंदोलन यशस्वी ठरले आहे.

ADVERTISEMENT

जेजुरी विश्वस्त प्रकरण काय?

मार्तंड देवस्थान समितीच्या मागील विश्‍वस्तांचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये संपला. त्यानंतर धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाकडून निविदा प्रसिद्ध करून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 500 पेक्षा अधिक अर्ज सादर झाले होते. त्यापैकी 85 अर्ज अपात्र ठरविण्यात आले, तर 350 पेक्षा अधिक व्यक्‍तींच्या मुलाखती घेण्यात घेतल्या गेल्या होत्या.

ADVERTISEMENT

Video >> Exclusive: कल्याण लोकसभेत सस्पेन्स? भाजपचीही तयारी? श्रीकांत शिंदेंनी सांगितली मोठी गोष्ट 

निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विश्वस्त म्हणून शहरातील किमान 4 जणांची निवड करावी, अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. पण, जेजुरीतील व्यक्तींना न घेता पुणे जिल्ह्यातील इतर ठिकाणचे रहिवासी असलेल्या 5 व्यक्तींना निवडण्यात आले. त्यांची निवड कोणत्या निकषावर करण्यात आली? आणि मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी म्हणून निवड प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप केला आहे, असा आरोप आता ग्रामस्थांकडून केला गेला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT