बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्ताराआधी टाकणार बॉम्ब! म्हणाले, ‘पुढचा प्रवास…’
अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर बच्चू कडू चांगलेच अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
ADVERTISEMENT

Bacchu Kadu Marathi : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या पक्षाबाहेरच्या आमदारांपैकी एक होते आमदार बच्चू कडू. पण, याच बच्चू कडूंचा अपेक्षाभंग झाल्याचं दिसत आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांत वेगवेगळी विधानं करत नाराजी बोलून दाखवली असून, आता बच्चू कडू एक मोठी घोषणा करणार आहेत. त्यांनीच याबद्दल सूचक वक्तव्य केलं असून, कडू कोणता बॉम्ब टाकणार याची चर्चा सुरु झाली आहे.
अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या बंडात सामील झाले. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर बच्चू कडू यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा कायम होत राहिली. मात्र, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांना अपंग विभागाचे अध्यक्ष करून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे बच्चू कडूंचा पत्ता कटल्याचे म्हटले गेले.
वाचा >> Shiv Sena vs NCP: सुनील तटकरेंचं मोठं विधान, गोगावलेंसाठी ‘गुड न्यूज’; पण..
अजित पवारांच्या बंडानंतर बच्चू कडूंच्या मंत्री होण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर बच्चू कडू चांगलेच अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू म्हणाले होते की, “खातेवाटपाचा गोंधळ सुरू असून आता तीन इंजिनचं सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार मजबूतही होऊ शकते किंवा त्यात बिघाडीही होऊ शकते. बिघाडा होऊ नये म्हणूनच बैठका सुरू आहेत. कुणाला कोणतं खातं द्यायचं, कोणता जिल्हा द्यायचा असे प्रश्न आहेत. दिसायला सोपं आहे. पण आतून पोखरलेलं असू शकतं.”
बच्चू कडू इतक्यावरच थांबले नाही, तर ते पुढे असंही म्हणाले, “आमदारांची नाराजी होणारंच, शेवटी पद आहे. सगळीकडे आनंद नाही, विरोधी पक्षातही नाही. सत्ताधारी पक्षातही नाही”, असं सांगत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.










