इंजिनिअर बहिणींनी एकाच मुलासोबत केलं लग्न, कारण ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकीकडे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा सूर अनेक तरुणांच्या तोंडी असताना एका तरुणाने दोन मुलींशी लग्न केल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात दोन तरुणी एका तरुणाच्या गळ्यात वरमाला घालत आहेत. इंजिनिअर असलेल्या दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत संसार का थाटला असेल, असा प्रश्न सगळ्यानाच पडला. या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

रिंकी आणि पिंकी या तरुणींनी एकाच मुलासोबत थाटला संसार

अकलूजमध्ये एक विवाह सोहळा पार पडला. इतर सोहळ्याप्रमाणेच सर्व काही एकसारखंच होतं. एक गोष्ट वेगळी होती आणि त्यामुळे अनेकजण अचंबितही झाले. त्याच कारण म्हणजे लग्न मंडपात एक नवरदेव होता आणि दोन नवऱ्या. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत सात फेरे घेतले. महत्त्वाचं म्हणजे बहिणी आयटी इंजिनिअर आहेत आणि एकाच आयटी कंपनीत कार्यरत आहेत.

भारताचे हे चार समलिंगी कपल; सोशल मीडियावर होत आहे यांची भरपूर चर्चा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जुळ्या बहिणींच्या लग्नाचा व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबईतील कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांनी अंधेरी येथील अतुल या तरुणासोबत शुक्रवारी (3 डिसेंबर) दुपारी हॉटेल गलांडे येथे विवाह केला. या विवाहाचे फोटो व चित्रीकरण व्हायरल झाल्याने अकलूज परिसरात चर्चेला उधाण आले असून, सर्वानाच विवाहाच्या कारणाबद्दलची उत्सुकता जागवली गेली.

ADVERTISEMENT

दोन्ही बहिणींनी एकाच तरुणासोबत का केला विवाह? अतुल त्यांच्या आयुष्यात कसा आला?

रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणी आहेत. जुळ्या असल्यानं त्यांचं एकमेकींशी घट्ट नातं आहे. दोघी इतक्या एकमेकीत गुंतलेल्या की एकीला त्रास झाला, तर दुसरीला त्रास, अशी दोघींची स्थिती. बालपणापासून दोघींच्या आवडीनिवडीही एकसारख्याच. शिक्षण एकत्रित करुन आयटी इंजिनिअर झाल्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला लागल्या. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोघीही आईसोबत राहतात.

ADVERTISEMENT

सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तिघींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्यानं अतुलनं तिघींची रात्रदिवस सेवा केली. तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण होऊन यातूनच जुळ्या बहिणीतील एकीचे त्याच्यावर प्रेम जडले.

दोन्ही बहिणी एकमेकींना सोडून कधीच राहिलेल्या नाही. वेगळं होणं दोघींना अशक्य झाल्यानं त्यांनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. रिंकी, पिंकीच्या आईनेही अतुलसोबत एकत्रित विवाह करायला संमती दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT