कॅबिनेट मंत्री की, जिल्हाधिकारी…15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिंदे सरकारचा दिर्घकाळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. १८ मंत्र्यांचा शपथविधी राजभवनमध्ये पार पडला. परंतु अजून खातेवाटप झालेलं नाही. कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री हे ठरलेलं नाही त्यामुळे ध्वजारोहण कोण करणार हे निश्चित नव्हते. आता शिंदे सरकारने एक यादी जारी केली आहे त्यामध्ये कोण ध्वजारोहण करणार याची नावं समोर आली आहेत. १८ जिल्ह्यामंध्ये स्थानिक मंत्री तर बाकी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त ध्वजारोहण करणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

देवेंद्र फडणवीस- नागपूर

सुधीर मुनगंटिवार- चंद्रपूर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील- पुणे

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर

ADVERTISEMENT

गिरीश महाजन- नाशिक

ADVERTISEMENT

दादा भुसे – धुळे

गुलाबराव पाटील- जळगाव

रवींद्र चव्हाण- ठाणे

मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर

दीपक केसरकर- सिंधुदुर्ग

उदय सामंत- रत्नागिरी

अतुल सावे- परभणी

संदिपान भुमरे- औरंगाबाद

सुरेश खाडे- सांगली

विजयकुमार गावित- नंदुरबार

तानाजी सावंत- उस्मानाबाद

शंभूराज देसाई- सातारा

अब्दुल सत्तार- जालना

संजय राठोड- यवतमाळ

अमरावती- विभागीय आयुक्त

कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी त्या-त्या जिल्हाचे कलेक्टर ध्वजारोहण करणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण खातेवाटप लांबणीवर

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी निवासस्थानाबद्दल देखील प्रत्येक मंत्र्यांकडून दोन ते तीन बंगल्यांचे ऑप्शन मागितले आहेत. कुणाला कुठलं खातं द्यायचा आणि कुठला बंगला द्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेणार आहेत. खाते वाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस यांचा प्रयत्न असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिंदे सरकारचा अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी १० तारखेला शपथ घेतली आहे. त्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. गेल्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच काम करत होते. सध्याच्या सरकारचा पेच हा कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल अजून यायचा आहे. शपथविधी होण्याअगोदर विरोधी पक्ष सतत टीका करत होते की कोर्टाच्या निकालामुळे शपथविधी लांबवला जात आहे. आता शपथविधी झालेला आहे, कोणाकडे कोणते मंत्रिपद जाईल हे अजून निश्चित झालेले नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT