साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जी तुरुंगाबाहेर, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली….

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शीना बोरा हत्याकांडामुळे अवघा देश हादरला होता. इंद्राणी मुखर्जी ही या प्रकरणातली मुख्य आरोपी होती. तिला साडेसहा वर्षांनी जामीन मंजूर झाला. बुधवारी म्हणजेच १८ मे रोजी इंद्राणीला जामीन मिळाला. आज त्याची प्रत मुंबईतल्या भायखळा तुरुंगाला प्राप्त झाली त्यानंतर इंद्राणी साडेसहा वर्षांनी तुरुंगाबाहेर पडली आहे. यानंतर तिने पहिली प्रतिक्रियाही दिली आहे.

इंद्राणी मुखर्जी तुरूंगाबाहेर पडल्यावर काय म्हणाली?

आज मी मोकळ्या हवेत श्वास घेतो आहे. गेल्या सात वर्षात पहिल्यांदा… यासाठी मी आनंदी आहे. आज भारतीय न्यायव्यवस्थेवर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. प्रत्येकाने आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. या सगळ्या प्रकरणात मी आणि पीटर वेगळे झालो. मात्र मी त्याला आणि इतर कुणालाही दोष देणार नाही. मी सध्या माझ्या तुरुंगातल्या दिवसांवर पुस्तक लिहिलं आहे. लवकरच ते प्रकाशित केलं जाईल. त्याबद्दल मी मीडियाला सांगेनच.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुरुंगाने मला व्यक्ती म्हणून बदललं. मी जास्त सहनशील झाले आहे. मी माफ करायलाही शिकले आहे. मला तुरुंगात विविध प्रकारची माणसं भेटली. काही अट्टल गुन्हेगारही होते. प्रत्येक वाईट माणसात काहीतरी चांगली गोष्ट असतेच. असं इंद्राणी मुखर्जीने म्हटलं आहे.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणीला साडेसहा वर्षांपूर्वी अटक झाली होती.

ADVERTISEMENT

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला आहे. तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जी जेलमधून बाहेर येणार आहे. जस्टीस एल. नागेश्वर राव, जस्टीस बी.आर.गवई आणि जस्टीस ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी इतक्यात संपणार नसून इंद्राणी साडेसहा वर्ष तुरुंगात असल्यामुळे तिचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

ADVERTISEMENT

आज काय रंगली चर्चा?

इंद्राणी मुखर्जी जेलमधून बाहेर आल्यानंतर तिचा लुक आणि मेक अप अगदी छान होता. तुरुंगात या सुविधा मिळतात का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तसंच इंद्राणीच्या सुटकेनंतर तिच्या मेकअपची चर्चा चांगलीच रंगलेली पाहण्यास मिळाली.

काय आहे प्रकरण?

एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराचं अपहरण करुन हत्या झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला पोलिसांनी पकडून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य करत या प्रकरणात इंद्राणीचाही सहभाग असल्याचं पोलिसांना सांगितलं. गाडीत गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून रायगडमध्ये जाळण्यात आल्याचं ड्रायव्हरने पोलिसांना सांगितलं.

ज्यानंतर २०१५ साली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने इंद्राणी मुखर्जीसह तिचा पती पीटरला अटक केली होती. मार्च २०२० मध्ये पीटर मुखर्जीला स्पेशल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. काही दिवसांपूर्वीच इंद्राणीने जेलमध्ये असताना एका महिला कैदीने शीना बोराला आपण काश्मीरमध्ये पाहिल्याचं सांगत तपासाची मागणी केली होती. परंतू हा दावा सीबीआयने फेटाळला होता.आतापर्यंत इंद्राणी मुखर्जीने २०१६, २०१७, २०१८, २०२० आणि २०२१ मध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. परंतू प्रत्येकवेळी तिच्या पदरात निराशा पडली. अखेरीस सुप्रीम कोर्टाने तिला बुधवारी जामीन मंजूर केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT