“हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरबा...”, बजरंग दलाच्या आरोपावरून राडा! घडलं काय?

मुंबई तक

Garba Cancelled : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा कार्यक्रम रद्द करण्यात आला. बजरंग दलाकडून एक मोठा दावा करण्यात आल्यामुळे गरब्याचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंदूरमध्ये बजरंग दलाकडून गरब्याचे आयोजन रद्द

point

नेमकं असं काय घडलं?

point

आयोजक फिरोज खान यांचे आवाहन

Garba Cancelled in Indore by Bajrang Dal : देशभरात नवरात्रोत्सवाचा चांगलाच धुमधडाका सुरू आहे. कालपासून म्हणजेच गुरूवारी 03 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीला सुरूवात झाली. पण या सर्वात एक धार्मिक वाद चर्चेत आला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा कार्यक्रम रद्द करण्यात आला. बजरंग दलाकडून एक मोठा दावा करण्यात आल्यामुळे गरब्याचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. (Bajrang Dal cancelled garba program in Indore accusing Muslim organizer of love jihad)

नेमकं असं काय घडलं?

इंदूरमधील भवरकुवा परिसरात गेल्या 35 वर्षांपासून नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान होते. त्यांच्यावर बजरंग दलाकडून लव्ह जिहादचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “या कार्यक्रमाचा उपयोग हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी केला जातो”, असा आरोप स्थानिक बजरंग दलाने केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

तर, विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) स्थानिक नेते राजेश बिंजवे यांनी सांगितले की, बजरंग दलाने भवरकुवा पोलिसांना निवेदन सादर केले. 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अश्लीलता पसरवण्यासाठी गणेश नगरमध्ये हा 10 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांनी सांगितले की, बजरंग दलानेच पोलिसांना शिखर गरबा मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची विनंती केली होती. कारण फिरोज खान नावाची व्यक्ती या गरबा इव्हेंटशी जोडली गेली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp