आलिया भट्टसोबत लग्न कधी करणार?; रणबीर कपूर म्हणाला, ‘मला पिसाळलेलं कुत्रं चावलंय का?’

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातील रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते. सध्या दोघांच्या लग्नाची चर्चा असून, काही दिवसांपूर्वी सब्यासाची सोबत आलिया भट्टचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. दोघंही कधी लगीनगाठ बांधणार आहे, अशी उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. लग्नाच्या तारखेबद्दल बोलताना मात्र, रणबीर कपूरने वेगळंच उत्तर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातील रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते. सध्या दोघांच्या लग्नाची चर्चा असून, काही दिवसांपूर्वी सब्यासाची सोबत आलिया भट्टचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. दोघंही कधी लगीनगाठ बांधणार आहे, अशी उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. लग्नाच्या तारखेबद्दल बोलताना मात्र, रणबीर कपूरने वेगळंच उत्तर दिलं आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. २०१८ मध्ये दोघांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाचं शुटिंग केल्यानंतर दोघांमधील रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, अलिकडेच दोघांनीही चित्रपटाचं शुटिंग संपवलं. वाराणसीमध्ये चित्रपटाचं शुटिंग संपलं.

ब्रह्मास्र निमित्ताने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांच पडद्यावर सोबत दिसणार आहे. त्यामुळे रणबीर-आलियाच्या चाहत्यामध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्यातच अलिकडेच आलियाचा सब्याची सोबतचा फोटो समोर आल्यानं लग्नाच्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे.

हे वाचलं का?