Rustom: नौदलाच्या ‘रूस्तम’ची खरी कहाणी! भारतात का ठरलं होतं हे बहुचर्चित प्रकरण?

रोहिणी ठोंबरे

1959 रोजी अनेक महिने समुद्रात घालवून के.एम नानावटी मुंबईला परतले. पण यावेळी त्यांना सिल्व्हियाच्या वागण्यात काही बदल दिसला. सुरुवातीला त्यांना वाटले की त्यांची पत्नी रागावली आहे कारण त्यांना अनेक महिने समुद्रात राहावे लागले. त्यामुळे दोघेही कमी वेळ एकत्र घालवू शकले. पण नंतर बरेच दिवस सिल्व्हियाच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही, तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे कारण विचारलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

The True story of the Rustom Movie : एक माणूस दुसऱ्या माणसाला गोळ्या घालतो. आणि पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण करतो. न्यायाधीशाला माहीत आहे, वकिलाला माहीत आहे, खून कोणी केला हे साऱ्या जगाला माहीत आहे. कबुलीही खुनीनेच दिली आहे. पण तरीही ज्युरी त्याला निर्दोष घोषित करते. आज आपण भारतातील सर्वात आश्चर्यकारक आणि बहुचर्चित प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यावर अनेक चित्रपट बनले. मोठमोठे लेख लिहिले गेले. हे प्रकरण इतकं प्रसिद्ध झालं की ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आणि लोकांनी कोर्टात रांगा लावल्या. ही कहाणी K. M. Nanavati (नानावटी प्रकरण) आणि महाराष्ट्र राज्य प्रकरणाची आहे. (Rustom Movie Which Based On KM Nanavati His Real Story)

27 एप्रिल 1959 रोजी मुंबईतील एका पोलीस ठाण्यात नौदलाची वर्दी घातलेला एक माणूस दाखल होतो. तिथे उपस्थित इन्स्पेक्टर लोबोला तो सांगतो, ‘मी एका माणसाला गोळी मारली आहे.’ यावेळी इन्स्पेक्टर लोबो यांना माहित होते की कोणाबद्दल बोललं जात आहे. ते म्हणतात, ‘तो माणूस मेला आहे. हा मेसेज मला नुकताच गामदेवी पोलीस ठाण्यातून आला.’ वर्दीतला व्यक्ती उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. लोबो त्याला विचारतात, ‘तुम्ही चहा पिणार का?’ तो उत्तर देतो, ‘नाही, फक्त एक ग्लास पाणी.’ यानंतर तो खुर्चीवर बसतो.

मुंबईत अग्नितांडव, गोरेगावातील भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू

हत्येनंतर आत्मसमर्पण करणाऱ्या या व्यक्तीचं नाव के.एम.नानावटी असं होतं. नानावटी हे पारशी समाजाचा होते. भारतीय नौदलात ते लेफ्टनंट कमांडर होते. त्यांच्या पत्नीचं नाव सिल्विया होतं. 1949 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये वाढलेल्या सिल्व्हियाशी लग्न केलं. तीन मुले होती. दोन मुलगे आणि एक मुलगी. जनजीवन सामान्य होतं. नानावटी, यांनी दावा केल्याप्रमाणे, त्यांचं सिल्व्हियावर खूप प्रेम होतं. पण नंतर या प्रेमापोटी एक दिवस ते खुनी झाले.

हे वाचलं का?