Mahayuti Government च्या विकासकामांवर कामावर राज्यातील जनता खूश? आकडेवारीत किती टक्के लोक नाराज?

मुंबई तक

यंदाच्या निवडणुकीत जनता सरकारच्या कामावर किती खूश आहे, सरकारने त्यांना आवश्यक असलेली कामे करतंय का? याबद्दल सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामधून नेमकं काय समोर आलं ते पाहुयात.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुती सरकारने केलेल्या कामांवर जनता खूश?

point

किती टक्के लोकांना वाटतं चांगली कामे झालीत?

point

राज्यातील जनता महायुतीला संधी देणार का?

विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष सध्या प्रचारात ताकद लावताना दिसत आहेत. येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत जनता ठरवणार आहे की, पुढचा मुख्यमंत्री कुणाचा होणार. त्यामुळे आपल्या कामाचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीचे नेते घरोघरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकही सरकारच्या अपयशाचे पाढे वाचून दाखवत आहेत. प्रचाराच्या या संपूर्ण रणधुमाळीत जनतेचं लक्ष असतं ते विकासाच्या कामांची पूर्ण केलेली वचनं आणि येणाऱ्या काळातील विकासासाठी दिली जाणारी आश्वासनं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता सरकारच्या कामावर किती खूश आहे, सरकारने त्यांना आवश्यक असलेली कामे करतंय का? याबद्दल सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामधून नेमकं काय समोर आलं ते पाहुयात. ( Maharashtra Public Opinion Survey amid Vidhan Sabha Elections)

 

हे ही वाचा >>Election 2024: तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा 36 तासांपासून होते बेपत्ता! नेमकं घडलं तरी काय?

 


राज्यात मागच्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीचं सरकार अस्तित्वात असून, या सरकारने अनेक योजना जाहीर करुन ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, आपल्या परिसरात, शहरात झालेल्या विकासावरुन जनतेचा सरकारबद्दलचा दृष्टीकोण ठरत असतो. त्यामुळे या निवडणुकीत जनतेला आपल्या भागात झालेल्या विकासाच्या प्रश्नावर काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, 52 टक्के लोकांना आपल्या भागात विकास झाला असं वाटतंय. या सर्व्हेतून काय आकडेवारी समोर आली, जाणून घेऊ.


सरकारने आपल्या भागात केलेल्या कामांबद्दल आपली प्रतिक्रिया काय? 
 

हे ही वाचा >>Election 2024: तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा 36 तासांपासून होते बेपत्ता! नेमकं घडलं तरी काय?

 

चांगली विकासकामं झाली (GOOD) 52.5
सामान्य स्वरुपात कामे झाली (AVERAGE) 21.5
फार विकासकामं झाली नाही (POOR) 23.2

 

हे वाचलं का?

    follow whatsapp