मोठी बातमी… तब्बल 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान, C-60 फोर्सची मोठी कारवाई

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गडचिरोली: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून आत्ताच्या क्षणाला एक मोठी बातमी समोर आली आहे. आज (21 मे) गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्र अंतर्गत पयडी जंगलात नक्षलवादी (Naxals) आणि पोलिसांच्या (Police) चकमकीत तब्बल 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. C 60 फोर्सने 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून अद्यापही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ‘मुंबई तक’ला दिली आहे.

गडचिरोलीच्या गोंदिया रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या ऑपरेशनच्या वृत्ताला दुजोरा दिला असून हे अद्यापही काही नक्षलवादी हे कोटमी जंगलात लपून बसलेली असल्याची शंका आहे. त्यामुळेच पोलिसांकडू शोध मोहीम सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच अलर्ट मोडवर राहून हे ऑपरेशन सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कोटमी हा जंगल परिसर छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागूनच आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा वावर असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. दरम्यान, आज देखील या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात जमा होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे याच माहितीच्या आधारे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं. याच ऑपरेशनदरम्यान, अचानक नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे C-60 फोर्सच्या टीमकडून देखील गोळीबार करण्यात आला. या भागात अनेक तास दोन्ही बाजूने गोळीबार सुरुच होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नक्षलवादी भागातील तरुणांना पोलिसांच्या मदतीने मिळणार नोकऱ्या

दरम्यान, या एकाच वेळी 13 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे नक्षलवाद्यांकडून सातत्याने या भागातील पोलिसांना टार्गेट केलं जातं. ज्यामध्ये आतापर्यंत हजारो पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

ADVERTISEMENT

काही दिवसापूर्वीच गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील एका पोलीस स्टेशनवर नक्षलवाद्यांकडून थेट ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. मात्र, त्याचा स्फोट होऊ न शकल्याने येथे मोठी जीवितहानी टळली होती. यावेळी नक्षलवाद्यांचा थेट पोलीस स्टेशनच उडवून देण्याचा धाडसी कट होता. सुदैवाने ग्रेनेडचा स्फोट न झाल्याने येथील पोलीस अगदी थोडक्यात बचावले. पण त्यामुळे नक्षलवाद्यांचं धाडस अधिक वाढल्याने पोलीस यंत्रणेची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

ADVERTISEMENT

गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक, काय घडतंय नेमकं?

दरम्यान, 5 मार्च 2021 रोजी देखील गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली-भामरागड तालुक्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात दोनदा मोठी चकमक झाली होती. छत्तीसगड राज्याची सीमा जवळ असलेल्या या सीमावर्ती भागात गडचिरोली नक्षलविरोधी पथकाचे जवान मोठी मोहीम राबवत होते. या मोहिमेत सुमारे 100 जवान एकत्र होते. मात्र नक्षलवाद्यांनी एका टेकडीवर असलेल्या C-60 पथकाला चहूबाजूंनी घेरल्यानंतर धुमश्चक्री उडाली होती.

या चकमकीत एक जवान गंभीर जखमी झाला होता. यावेळी अडचणीत असलेल्या जवानांच्या दिमतीला गडचिरोली पोलिसांचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. तसेच अहेरीच्या प्राणहिता पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कुमक कोपर्शी जंगल परिसरात पाठविण्यात आली होती. (13 Naxals encountered by C 60 force in Yettapalli district gadhchiroli)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT