बीड: पान टपरीजवळ उभ्या असलेल्या चौघांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड: बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे रस्त्याच्या कडेला पान टपरी समोर बोलत उभे असलेल्या चौघांना एका भरधाव कारने चिरडल्याची घटना आलेल्या सोमवारी (4 एप्रिल) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोघांचा जागेवर तर एकाचा व्यक्तीचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. अंबाजोगाईकडून घाटनांदूरकडे जाणाऱ्या या कारची ही धडक एवढी जोरदार होती की, त्यामध्ये कारचा देखील चक्काचूर झाला आहे.

अंबाजोगाईकडून कार क्रमांक MH-24-V-2518 अतिशय भरधाव वेगात आली. यावेळी घाटनांदूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना धडक देऊन जवळपास शंभर मीटरपर्यंत त्यांना फरफटत नेलं.

या अपघातात वैभव सतीश गिरी ( वय 28 ), लहू बबन काटुळे (वय 30) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश विठ्ठल फुलारी (वय 47), उद्धव निवृत्ती दोडतले (वय 50) आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

खेळत असताना अंगावरुन गेली कार, दैव बलवत्तर म्हणून वाचला चिमुरडा

ADVERTISEMENT

तीन जणांचा बळी घेणारी ही कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला. कारमधील तिघेही जण मद्यधुंद असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून केला जात आहे. हा अपघात एका सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. याप्रकरणी कार चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सध्या मागणी केली जात आहे.

ADVERTISEMENT

सात विद्यार्थ्यांनी जीव गमावलेल्या ‘त्या’ ठिकाणीच विचित्र अपघात; दोघे ठार, तीन गंभीर

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटनेला काही दिवस होत नाही, तोच त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी पुन्हा एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते.

सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेल्सुरा शिवारात विचित्र अपघात घडला होता. जंगली रानडुक्कर आडवा गेल्याने इंडिका गाडी अपघातग्रस्त झाली होती. त्याचवेळी टू व्हीलरने जाणारे दोन व्यक्ती त्यांना मदत करण्यासाठी थांबले. एक व्यक्ती मदत करण्यासाठी गेला असता बालकांसह आई रोडच्या कडेला उभे होते, मात्र त्याच वेळेस भरधाव वेगाने येणार्‍या फॉर्च्युनर गाडीने अपघात ग्रस्त इंडिका कारला जोराची धडक दिली.

त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माय लेकांनाही उडवलं आणि टू व्हीलरने यवतमाळला जाणार्‍या दोन लोकांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले होते, तर एक किरकोळ जखमी झाला होता. मृतकांमध्ये चार वर्षीय बालकाचा समावेश होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT