यामागचा मास्टरमाईंड कोण?; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावरून अजित पवार संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक होत असून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनावरून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीवरून राज ठाकरेंनाही उलट सवाल केला.

अजित पवार म्हणाले, “ग्लोबल वार्मिंगचं संकट म्हणजे काय, हे आता महाराष्ट्राला आणि देशाला कळायला लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही वेगवेगळे निर्णय घेत आहोत. कोरोनाची दोन वर्ष अडचणीची गेली. त्यातही राज्याच्या विकासाला खिळ न बसू देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. काल मंत्रिमंडळ बैठकीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला म्हणाले, की मलाही सभेला जायचं आहे, पण ऑपरेशनमुळे प्रवास करू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही सगळे त्यांचा सांगावा घेऊन कोल्हापुरात आलेलो आहोत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“ही निवडणूक नियतीने आपल्यावर लादलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीत जाधवांना निवडून दिलं. काही राजकीय समीकरण बदलली. सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली. बऱ्याच जणांना वाटतं होतं हे तिघे एकत्र येतील का? महाराष्ट्राच्या भल्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यातून एक पुरोगामी विचार पुढे न्यायचा होता. महाराष्ट्राचे विकासाचे प्रश्न सोडवायचे होते. सर्वसामान्यांना दिलासा द्यायचं काम करायचं होतं.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“तुमच्या हिताचेच निर्णय घेतले जातील. जयश्री जाधवही त्याच गोष्टींचा पाठपुरावा करतील. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात. त्यांना पाठिंबा देणारा आमदार आपल्याला पाठवायचा आहे. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“महाराष्ट्रच नाही, तर भारतातील अनेक भाग शरद पवार यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. जवळपास ६० वर्षे महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण शरद पवार आहेत. अनेक प्रकारचे चढउतार आले, शरद पवार ढगमगले नाहीत. त्यांनी सातत्याने मजूर, कामगार, कष्ट करणारा माणूस, शेतकरी असेल, बलुतेदार असतील या सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं.”

ADVERTISEMENT

“चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. अनेकदा एसटीचे संप झाले. त्याच्यामध्ये त्यांनी मदतीची भूमिका शरद पवार यांनी घेतली. केंद्राच्या बरोबरीने महाराष्ट्रातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळालं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. उद्योगपती आणि कामगार यांच्या अंतर पडलं, तर ते अंतर दूर करण्याचं काम त्यांनी केलं. आताही करता आहेत,” असं अजित पवार म्हणाले.

“आता एसटीचा संप होवू नये म्हणून अनिल परब असतील, अशोक चव्हाण, मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. आम्ही सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं की, बाबानो तुम्ही महाराष्ट्रातील मुलं आहात. तुम्ही ड्रायव्हर-कंडक्टर असलात, तरी तुम्ही आमच्या परिवारातील आहात. विलीनीकरणाबद्दल न्यायालय देईल, तो निर्णय मान्य करू. समिती नेमली. संपवा मिटवा म्हणालो. मुलामुलींना शाळेत जायला एसटी नाही. गरीब माणसाला दवाखान्यात जायचं तर एसटी नाही. ती सुरू झाली पाहिजे. कोरोना काळात कोट्यवधी रूपये राज्य सरकारच्या तिजोरीतून आम्ही एसटीसाठी दिले. मेहेरबानी केली नाही, कारण ती आपलीच माणसं आहेत,” असं अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

“काही लोकांनी त्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला. त्यांना चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला. मला कळत नाही की, न्यायालयाचा अधिकार आपण मान्य करतो. न्यायालयाने जे काही सांगितलं ते परिवहन मंत्री अनिल परब यांनी ऐकलं. त्यांनी मला, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा सगळ्यांना सांगितलं. आम्ही ताबडतोब हो म्हणालो. तिथं संपामध्ये बसलेल्यांनी गुलाल उधळला. पेढे वाटले. मग आज असं काय घडलं की शरद पवार यांच्या घरापर्यंत ही लोकं आली. कुणी यांना भडकावलं? याच्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे? कशामुळे हे घडलंय? कोण चिथावणीखोर भाषणं देतंय?,” अशी प्रश्नांची सरबत्तीच अजित पवारांनी केली.

“आपण शाहू महाराजांच्या करवीर नगरीत राहतो. शाहू-फुले-आंबेडकरांनी देशाला दिशा देण्याचं काम केलं. समतेचा विचार दिला. सर्व जातीधर्माच्या लोकांना वर घेऊ जाण्याची शिकवण दिली. अशा महाराष्ट्रात या घटना घडत आहेत. पोलिसांचं हे अपयश आहे. त्याची माहिती घेऊ. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातोय हे कुणाला का बघवत नाहीये? असा सवाल अजित पवारांनी केला.

“देश पातळीवरील पहिले पाच मुख्यमंत्री बघितले, तर त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव येतं. ही वस्तुस्थिती आहे. कोरोना काळात त्यांनी राज्याचं आरोग्य चांगलं राहिल, सुविधा कशा मिळतील, या बाबी लक्षात घेऊन कोरोनातून बाहेर काढणण्याचं काम केलं.”

“इतके वर्ष सगळ्या गोष्टी चालल्या. आता कुठला तरी एक वक्ता उठतो आणि सांगतो भोंगे वाजवायचं बंद करा. अरे! त्याच्या आधी काय झोपा काढल्या होत्या का? त्यांचं पाच वर्ष सरकार होतं, का नाही निर्णय घेतला नाही. शेवटी सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जायचं. आपण राम नवमी साजरी करायची. आपण हनुमान जयंती साजरी करायची. आपण महावीर जयंती साजरी करायची. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही तितक्याच उत्साहाने साजरी करायची. दिवाळी, ख्रिसमस, रमजानचा पवित्र महिनाही साजरा करायचा. ही शाहू-फुले-आंबेडकरांची शिकवण आहे,” असं अजित पवार म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT