माजी गृहमंत्री अनिल देशमुख हनीमूनला गेले का? अमृता फडणवीसांचा खोचक प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून कुठे आहेत ते कुणालाच माहित नाही. त्यांच्याबाबत सरकारनेही काही सांगितलेलं नाही. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे आरोप केले होते. मात्र आता हे दोघेही कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. अशात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक खोचक प्रश्न मविआ सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काय हनीमूनला गेले आहेत का? असा खोचक प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. एक माजी पोलीस कमिश्नर आणि माजी गृहमंत्री कुठे हनीमूनला गेले आहेत माहित नाही. तुम्हाला कुठे दिसले तर तुम्ही पण रिपोर्ट करा, म्हणजे त्यांना पकडता येईल. असं त्या पत्रकारांना उद्देशून म्हणाल्या.

‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’ असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सामनामधून होणाऱ्या टीकेलाही अमृता फडणवीस यांनी खोचक उत्तर दिलं आहे. सामना टीका कुणावर करणार? जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल? असाही प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी, आयटी यांची छापेमारी झाली. आत्तापर्यंत पाचवेळा ही छापेमारी करण्यात आली आहे. यावरून शरद पवार यांनीही टोला लगावला. अनिल देशमुख यांच्यावर राज्यातल्या बार आणि रेस्तराँमधून सचिन वाझेला १०० कोटी रूपये दर महिन्याला वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप झाला होता. अँटेलिया प्रकरणानंतर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. तसंच मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे आरोप अनिल देशमुख यांच्यावर केले होते. हे सगळं प्रकरण हायकोर्टात गेलं.

ADVERTISEMENT

परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेत; जयंत पाटील यांची धक्कादायक माहिती

हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान त्यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग हेदेखील गायब आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ते परदेशात पळून गेले असावेत अशी शक्यता व्यक्त केली आहे. आता परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्या गायब होण्यावरून अमृता फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला आहे. याबाबत आता सरकारच्या वतीने कुणी उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT