विधानसभेला अध्यक्ष नाहीच… राज्यपालांनी फेटाळला प्रस्ताव; पाहा कोश्यारींनी काय दिलंय कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अधिवेशन सुरु झालेलं त्याचवेळेस मुंबई Tak ने अंदाज वर्तवलेला होता की, या अधिवेशनात सुद्धा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणं हे कठीण आहे. ज्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा जो प्रस्ताव पाठवला होता तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा फेटाळलेला आहे. या आठवड्याभरात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी असा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता. पण राज्यपालांनी हा प्रस्ताव अजिबात मान्य केला नाही. प्रस्ताव फेटाळताना राज्यपालंनी असं कारण दिलं की, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं असल्याने सध्या याबाबत मी निर्णय देणार नाही. अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे.

त्यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, सध्या तरी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता होणार नाही.

कोश्यारी हे राज्यपाल नसून ‘भाजप’पाल, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीनही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या.’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

कोश्यारी हे राज्यपाल नसून ‘भाजप’पाल, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची: नाना पटोले

ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदानाला राज्यपालांचा विरोध

ADVERTISEMENT

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत आवाजी मतदान प्रक्रियेला विरोध केला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने आवाजी मतदान घेण्याचं निर्णय हा मागील अधिवेशनातच घेतला होता. मात्र, राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नव्हती.

राज्यपालांनी काय म्हटलं होतं?

महाराष्ट्र सरकारने केलेली विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी नियम बदलला आणि गुप्त मतदान प्रक्रियेच्या ऐवजी आवाजी मतदान असा बदल केला. मात्र राज्यपालांनी ही आवाजी मतदानाची मागणी फेटाळून लावली होती. निवडणूक प्रक्रियेत करण्यात आलेला बदल असंवैधानिक आहे. असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी वेगवेगळी प्रक्रिया कशी काय असू शकते? असा सवाल राज्यपालांनी यावेळी उपस्थित केला होता.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्याला आता एक वर्ष झालं आहे. हिवाळी अधिवेशनात तरी अध्यक्ष निवडला जावा अशी मागणी राज्यपालांनी केली होती. मात्र त्यांनी आवाजी मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवल्यामुळे अध्यक्षपद हे अद्यापही रिक्तच आहे. त्यामुळे विधासभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच राज्य सरकारपुढे निर्माण झाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT