आजच्या 'भारत बंद'चा महाराष्ट्रात काय परिणाम? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / आजच्या ‘भारत बंद’चा महाराष्ट्रात काय परिणाम?
बातम्या

आजच्या ‘भारत बंद’चा महाराष्ट्रात काय परिणाम?

मुंबई: जीएसटी, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती यासारख्या अनेक मुद्द्यांवर आज (26 फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील अनेक व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना यांनी हा बंद पुकारला आहे. या दरम्यान, बाजारपेठा आणि ट्रान्सपोर्ट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. हा बंद आज सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. मात्र, असं असलं तरीही महाराष्ट्रात या बंदचा सध्या तरी कोणत्याही स्वरुपात परिणाम दिसून येत नाहीए. राज्यातील सर्व वाहतूक आणि बाजारपेठा या सुरुळीत सुरु आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात असोसिएशनने हा बंद पुकारला आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनद्वारे सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्व ट्रान्सपोर्ट सेवा बंद ठेवण्याचं अपील करण्यात केलं आहे. मात्र, राज्यात तरी या बंदचा फारसा परिणाम काही दिसून आलेला नाही.

ही बातमी पाहा: पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हाती? हे लोकांना ठाऊक-अजित पवार

दुसरीकडे देशभरातील जवळजवळ 40 हजार व्यापारी संघटनांनी देखील या बंदला पाठिंबा दिला असल्याचं समजतं आहे. हा बंद पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांसह, जीएसटी, ई-वे बिल यासारख्या अनेक मुद्द्यांवर आहे. यामुळे असोसिएशनशी संबंधित बाजार बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

देशातील 8 कोटींहून अधिक छोट्या दुकानदारांची संघटना कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन (AITWA) ने आज भारत बंद आणि चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या त्यांच्या काय आहेत नेमक्या मागण्या.

  • देशातील छोटे दुकानदार आणि व्यापारी हे अमेझॉनसारख्या रिटेल चेनच्या वाढत्या प्रभावामुळे आणि मनमानीमुळे खूप नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी

  • याशिवाय वस्तू आणि सेवा कर (GST) मध्ये देखील बदल करण्याची मागणी करत आहेत. जीएसटीमधील टॅक्स स्लॅब आणखी सोपे करण्यात यावेत अशी मागणी आहे.

  • व्यापारी संघटनेचं असं म्हणणं आहे की, लॉकडाऊनमुळे अनेक महिने व्यापाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला आहे. त्यातच सरकारने जीएसटीबाबत अनके वेगवेगळे नोटफिकेशन जारी करुन व्यापाऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे.

  • एक नॅशनल अॅडव्हान्स रुलिंग अथॉरिटी बनविण्यात यावं

  • एक अपीलेट ट्रायब्यूनल बनविण्यात यावं

  • जीएसटीच्या आधी आणि नंतरच्या अडकलेला रिफंड रिलीज केली जावी.

  • तपास यंत्रणांकडून व्यापाऱ्यांना दिला जाणारा त्रास थांबविण्यात यावा

  • प्रत्येक जिल्ह्यात जीएसटी कमिटीचं गठन केलं जावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − thirteen =

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त ‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट! CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी! नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का? IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं! Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण… IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल! Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर…; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी ‘वीर सावरकरां’च्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट! आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही ट्रोल बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला! Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा ‘ओरी’ कोण? महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, ‘जास्त पैसे असतील तर..’