मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असं म्हटलं आहे की मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन होईल. त्यानंतर महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते सगळं काही ठीक होईल असंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. जयपूरमध्ये नारायण राणे बोलत होते. नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? या चर्चा रंगल्या आहेत. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीत रवाना झाले आहेत. शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते दिल्लीत आहेत. तर देवेंद्र फडणवीसही आज दिल्लीत पोहचले आहेत.

एवढंच नाही तर गुरूवारपासूनच दिल्लीत भाजपचे नेते गेले आहेत. रात्री उशिरा चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसही त्याचवेळी भेटणार होते मात्र ते उशिरा पोहचल्याने त्यांनी आज अमित शाह यांची भेट घेतली. सूत्रांनी अशीही माहिती दिली आहे की महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट शिवसेनेच्या एका राज्यसभा खासदाराशीही झाली आहे. हा नेता उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानला जातो आहे.

‘बंद दाराआड ठरलं तेच अमित शाहांनी नाकारलं, हेच का तुमचं हिंदुत्व?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान आता नारायण राणे यांचा दावा समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या आहेत त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतं आहे असं म्हणत नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

ADVERTISEMENT

मार्च महिन्यात भाजप सरकार सत्तेवर येणार या नारायण राणे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली आहे ,नाना पटोले म्हणाले की भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष आहे, त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही ,त्यांच्या भविष्यवाणी ला काही अर्थ राहिलेला नाही, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारी पूर्ण पाच वर्षे चालेल.

ADVERTISEMENT

काय म्हणतात संजय राऊत?

शरद पवार हे दिल्लीत गेले आहेत यात नवीन काय? ते देशाचे नेते आहेत. सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते दिल्लीत आहेत. त्यातून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत कारण त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत आहेत. त्यांना मस्टरवर सही करायला जावं लागेल. महाराष्ट्राचं सरकार व्यवस्थित सुरू आहे. आता या चर्चांना काही अर्थ नाही. दोन वर्षे व्यवस्थित गेली आहेत. पाच वर्षे हे सरकार व्यवस्थित पूर्ण करणार आहे. नारायण राणे तर 11 दिवसात पडेल, पंधरा दिवसात पडेल अशा अनेक तारखा दिल्या होत्या. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते चांगलं काम करत आहेत. त्यांनी एक ब्लू प्रिंट तयार केली आहे. महाराष्ट्राचा एक नेता दिल्लीत जाऊन उत्तम काम करतो आहे. तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून कौतुक केलं पाहिजे. मात्र महाराष्ट्राचं सरकार पाडणं हा सूक्ष्म किंवा लघू उद्योग नाही. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT