Pankaja Munde: पंकजा मुंडेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दिल्ली (Delhi) दौऱ्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र वेगवेगळ्या चर्चांना बरंच उधाण आलं आहे. त्यातच आता अशीही माहिती समोर येत आहे की, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचीही भेट घेतली आहे. यामुळे आता यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये नेमके काही बदल होणार का? याविषयी चर्चा रंगू लागली आहे.

एकीकडे पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातही एक चर्चा अशी आहे की, पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रात पक्षीय पातळीवर अत्यंत मोठी जबाबदारी मिळू शकते.

मागील काही वर्षांपासून राज्यातील भाजपच्या नेतृत्वाकडून मुंडे कुटुंबीयांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार देखील प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात न आल्याने बीडमधील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देणं सुरु केलं आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान पंकजा मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याला फारच महत्त्व आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नुकताच मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानंतर रविवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठकीचं दिल्लीत आयोजन केलं होतं. याच बैठकीसाठी पंकजा मुंडे या देखील दिल्लीत गेल्या आहेत. पण याच बैठकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे या आपली नाराजी केंद्रीय नेतृत्वाकडे व्यक्त करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

त्यातच त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असल्याची देखील चर्चा आहे. अशावेळी या सगळ्याचे आता महाराष्ट्रात नेमके काय परिणाम पाहायला मिळतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, दुसरीकडे खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने बीड आणि परळीमधील मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

ADVERTISEMENT

Pankaja Munde दिल्लीला रवाना, राज्यात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण

यामुळे बीड जिल्ह्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा (Resignation) दिला आहे. यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये सारं काही सुरळीत नसल्याचं दिसून येत आहे.

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या राज्यात आपल्याला वरचढ होतील अशी भीती असल्याने राज्यातील भाजप नेतृत्वाने त्यांना डावललं असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT