पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा, भाजपची सरकारकडे मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलंच रंगताना दिसतं आहे. शरद पवारांचं नाव संजय राऊत यांच्या चार्जशीटमध्ये समोर आल्यानंतर आता भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणात गुरूआशिष कंपनीला काम देण्यात यावं यासाठी संजय राऊत यांनी त्यावेळी देशाचे कृषी मंत्री असेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी बैठक घेतली. या बैठकीला माजी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. मराठी माणसाला बेदखल करणाऱ्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेसोबत काय संबंध होता? याची पूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी गृहनिर्माण सचिवांचं विश्लेषण करणारं पत्र दिलं आहे. या पत्रावरून स्पष्ट होतं की म्हाडा प्राधिकरण असलं तरीही म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्यशक्तींचा दबाव होता. त्यामुळे चौकशीच्या या प्रकरणाचे धागे दोरे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यामागचं खरं सत्य बाहेर येण्यासाठी यासंदर्भातली एक उच्चस्तरीत आणि कालब्ध मर्यादेची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

काय आहे पत्रा चाळ प्रकरण?

गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिष फ्लॅटकडे राहणार होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

ADVERTISEMENT

ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचा एक संचालक होते. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवन अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

ईडीने या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीने नोंदवला होता. राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचे नावही समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT