चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘…तर तो पुरस्कार संजय राऊतांना देईन’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या कलगीतुरा रंगताना दिसत आहे. संजय राऊतांनी सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी राऊतांचा गौरव करण्याची इच्छा बोलून दाखवत चिमटा काढला आहे.

सामनामध्ये चंद्रकांत पाटील यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं. राऊतांच्या या विधानाला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

‘चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकू, त्यांची तेवढीच…’, राऊतांनी उडवली खिल्ली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कुणी शंभर कोटी. कुणी दीडशे कोटी. हे सव्वा रुपया. हरकत नाही. फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सूचवेन की थोडी रक्कम वाढवावी लागेल. कारण शेवटी मानहानी म्हणजे काय, तर माझी मानहानी झालीये आणि ती एव्हढ्या कोटींची आहे. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाहीये. त्यामुळे त्यांनी सव्वा रुपयांच्याऐवजी ही रक्कम थोडी वाढवायला पाहिजे’, अशी कोपरखळी चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावली.

‘संजय राऊत माझे मित्र आहेत. राजकारणात एकमेकांवर बोलायला लागतं वगैरे सगळं खरं. पण आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये एकमेकाला चिमटा जरी काढला तरी जखम होता कामा नये. त्यामुळे मी चिमटा काढतो पण जखम कुणाला होऊ देत नाही’, असं सांगत पाटलांनी संजय राऊतांना चिमटा काढला.

ADVERTISEMENT

शिवसेनेला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवलं; चंद्रकांत पाटलांचा ‘सामना’तून राऊतांवर प्रहार

ADVERTISEMENT

‘सातत्याने रोज बोलणारे, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही सातत्याने रोज लिहिणारे नावाचा एक पुरस्कार द्यायचा असेल, तर मी संजय राऊतांना देईन. रोज काहीतरी बोललंच पाहिजे. रोज काहीतरी लिहिलंच पाहिजे. बाकी शिवसेनेत कुणी बोलणारंच नाहीये. आमचे दिवाकर रावतेजी बोलत नाहीत. आमचे रामदासभाई बोलत नाहीत. आमचे रवि वायकर बोलत नाहीत. आमचे अनिल देसाई बोलत नाहीत. फक्त संजय राऊत. एका माणसांचा स्टॅमिना इतका? रोज सकाळी येऊन बोलायचं म्हणजे तयारी करावी लागते ना. त्यामुळे पुरस्कार देईन’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT