नितेश राणे बोलले ते गावाच्या विकासासाठी, त्यात गैर वाटतं नाही : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली : ग्रामपंचायतीला माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही, अशी मतदारांना धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे सध्या वादात सापडले आहेत. मात्र नितेश राणे बोलले ते गावच्या विकासासाठी बोलले. त्यात गैर काही वाटतं नाही, असं म्हणतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. पक्षाच्या कामासाठी ते आज हिंगोली दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, धमकी वगैरे काही नाही. विरोधकांना काम उरल नाहीत. नितेश राणे बोलले ते गावाच्या विकासासाठी बोलले. सिंधुदुर्ग जिल्हात नितेश राणेंवर प्रचंड प्रेम करणारा वर्ग आहे. विकास निधी हा जेव्हा विषय येतो तेव्हा सहज म्हणतो आपण, “तुम्ही भाजपला मत द्या, तुम्ही सरपंच द्या, आपण विकास करू.” आता थेट सरपंच निवडून येत असल्याने आमदारांनी सरपंच जर आपल्या विचारांचा आला तर पैसा देता येतीलं, असं म्हटलं. त्यामुळे मला वाटतं त्यात काही गैर नाही.

काय म्हणाले नितेश राणे?

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये सर्वपक्षीय नेते व्यस्त आहेत. याच प्रचारादरम्यान नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भाजपचा सरपंच निवडून देण्याचं आवाहन करताना निधीवरुन धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नितेश राणे म्हणाले, जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल, त्यात गावाचा मी विकास करीन, नाहीतर करणार नाही स्पष्ट सांगतो. माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहेत. आपण लपाछपवीवाले नाही. राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक पोटात असं नाही. चुकून पण इथे माझ्या विचाराच्या सरपंच झाला नाही तर मी एकही रुपयांचा निधी देणार नाही. एवढी काळजी निश्चितपणे घेईन.

याला आता तुम्ही धमकी समजा नाहीतर अन्य काही. आपलं कॅलक्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात ठेवा, सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनचा निधी असो, ग्रामविकासचा विकास निधी असो, 25:15 चा निधी असो केंद्र सरकारचा निधी असो. मी सरकारमध्ये, सत्तेत असलेला आमदार आहे.

ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी असो, पालकमंत्री असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असतील हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. अगरं नितेश राणेंच्या विचाराच्या सरपंच आला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT