भारतात कोरोनाचं संकट कायम; 24 हजार रुग्ण सक्रिय, महाराष्ट्रात नवीन व्हेरिएंटच्या शिरकावामुळे चिंता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात कोरोनाचं संकट कायम आहे. सध्या देशात एकूण सक्रिय रूग्णांची संख्या पाहिली तर ती 24 हाजार इतकी आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी गेल्या तीन दिवसांपासून देशात कोरोनाचे 2000 हून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली आहे.

मागच्या 24 तासात 2 हजारपेक्षा जास्त रुग्ण अढळले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची 2112 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि गेल्या 24 तासात 4 मृत्यू झाले आहेत. एका दिवसापूर्वी, देशात 2119 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर 10 मृत्यू झाल्याची नोंद देखील आहे. आता, भारतात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 4,46,40,748 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 5,28,957 वर गेली आहे.

इतक्या लोकांनी घेतली लस

आता देशातील रिकव्हरी रेट 98.76 टक्के झाला आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणांमध्ये एकूण संसर्गाच्या 0.05 टक्के समावेश होतो. आतापर्यंत कोरोनाविरोधी लसीकरणाचा आकडा 219 कोटी 53 लाख, 88 हजार 326 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 90 हजार 752 जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नवीन व्हेरिएंटच्या प्रवेशामुळे चिंता वाढली

देशात सणांचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. कोरोनाचा काळ आणि लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच लोक अनेक बंधनांशिवाय दिवाळी साजरी करण्याच्या मूडमध्ये आहेत. अशा परिस्थितीत बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असते, मात्र देशात करोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रवेशामुळे चिंता वाढली आहे. यापैकी, BQ.1 आणि XBB रूपे प्रमुख आहेत. निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

महाराष्ट्रात नवीन व्हेरिएंटचा शिरकाव; लस घेऊनही कोरोनाची लागण

महाराष्ट्रात आतापर्यंत XBB प्रकाराची लागण झालेले 18 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 13 रुग्ण पुण्यात आढळले आहेत. पुण्याशिवाय ठाणे आणि नागपूरमध्ये 2-2 तर अकोल्यात एक रुग्ण आढळून आला आहे. 24 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान हे रुग्ण आढळून आले आहेत. या 20 पैकी 15 जणांनी कोरोनाची लसही घेतली होती ही चिंतेची बाब आहे. उर्वरित ५ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

ADVERTISEMENT

WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी इशारा दिला आहे की XBB प्रकारांमुळे जगातील अनेक देशांमध्ये संसर्गाची नवीन लाट येऊ शकते. त्यामुळे नवीन लाट येण्याची भिती भारतीयांमध्ये पसरली आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेणे गरजेचे आहे. असं तज्ज्ञ सांगत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT