फडणवीसांकडून आणखी एक गौप्यस्फोट, यावेळेस थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (23 मार्च) एका नव्या प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई न करता प्रकरणावर पांघरुण घातलं. त्यामुळे आता या प्रकरणी मी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन थेट सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे.’ असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारला एका नव्या मुद्द्यावरुन घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. (Devendra Fadnavis Serious allegations against Thackeray government in phone tapping case)

पोलीस दलातील बदल्यासंदर्भात फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळं प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंनी या प्रकरणाची चौकशी न करता त्यावर चक्क पांघरुण घातलं. त्यांनी आपलं सरकार वाचविण्यासाठी या संपूर्ण प्रकरणावर पांघरुण घातलं. असा दावा फडणवीसांनी यावेळी करण्यात आली आहे.

पाहा देवेंद्र फडणवीस यांनी काय गंभीर आरोप केले:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘राज्य सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या मोठ्या पोस्टिंगसाठी पैशांची मोठी देवाणघेवाण झाल्याचं समोर आलं आहे. पण याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्याचीच बदली करण्यात आली.’ असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

‘मी गृहमंत्री असताना गुप्तचर विभागाकडून एका रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला होता. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुख्य सचिवांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली काही कॉल इंटरसेप्ट करण्याची परवानगी घेतली. ज्यानंतर काही अशी संभाषणं लक्षात आली की जी खूपच गंभीर होती. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि नेत्यांची देखील नावं समोर आली आहेत.’ असं फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचं गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब?-फडणवीस

ADVERTISEMENT

‘याबबात सीओआयने एका विस्तृत अहवाल तयार केला होता. जो 25 ऑगस्ट 2020 रोजी पोलीस महासंचालक आणि राज्याचे गृह सचिवांना सोपविण्यात आले होते. ज्यामध्ये याच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती मुख्यमंत्री ठाकरेंना देखील देण्यात आली होती. पण यावर कोणतीही कारवाई न करता मुख्यमंत्र्यांनी हा अहवला गृहमंत्र्यांना पाठवला. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं माहिती असून देखील मुख्यमंत्र्यांनी त्यावर पांघरुण घातलं. कारण त्यांना आपलं सरकार वाचवायचं होतं. शिवाय रिपोर्टमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ज्या अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केले त्यांचीच बदली करण्यात आली. शिवाय फोन टॅपिंगमध्ये ज्या व्यक्तींची पोस्टिंगसाठी नाव घेतली जात होती त्यांना त्याच ठिकाणी पोस्टिंग मिळाली.’ असा खळबळजनक आरोप फडणवीसांनी केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टच्या आधारे असं म्हटलं की, ‘महाराष्ट्र पोलिसांच्या उच्चस्तरीय पोस्टिंगसाठी पैशाची देवाणघेवाण झाली आहे.’ हा फडणवीसांनी केलेला फार गंभीर आरोप आहे.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री का बोलत नाहीत? -फडणवीस

याच पत्रकार परिषदेत फडणवीसांनी असंही म्हटलं आहे की, ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. तसंच याबाबत रिपोर्ट देऊन देखील सरकारकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता मी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे आणि यासंबंधी सगळे पुरावे त्यांना देणार असून सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे.’ अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे आधीच अडचणीत आलेलं सरकार हे आता या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर असे आरोप केले जात आहे. त्यात आता पोलीस दलातील बदल्यांमधील देवाणघेवाण प्रकरण समोर आलं आहे. अशावेळी आता महाविकास आघाडी या संपूर्ण आरोपांना कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

  • मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे पण मुख्यमंत्री काहीही बोललेले नाहीत. पवार साहेब मोठे नेते आहेत. पण त्यांना या प्रकरणी दिली जाणारी माहिती देखील चुकीची दिली जात आहे.

  • हे सगळं गंभीर आहे. काही जणांनी पोस्टिंगसाठी पैसे देखील दिले होते.

  • मुख्यमंत्र्यांना याचं गांभीर्य लक्षात आलं होतं पण आपलं सरकार वाचविण्यासाठी त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही.

  • यात अनेक आयपीएस आणि मोठ्या अधिकाऱ्यांची नावं येत आहेत. हे सगळं मी केंद्रीय गृहसचिवांना देणार आहे.

  • एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी याच गोष्टीवर पांघरुण घातलं.

  • मला आश्चर्य वाटतं की, यावर मुख्यमंत्र्यांनी का कारवाई केली नाही?

  • फोन टॅपिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार

  • आज संध्याकाळी फडणवीस केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार

  • यावेळी पोस्टिंगवर तात्काळ डीजी सुबोध जयस्वाल यांनी यावर आक्षेप घेतला

  • फोन टॅपिंग अहवालात नाव असणाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसारच पोस्टिंग देण्यात आलं

  • कारवाई करण्याऐवजी अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच बदली करण्यात आली

  • फोन टॅपिंगचा अहवाल देऊन देखील मुख्यमंत्र्यांकडून कारवाई करण्यात आली नाही

  • 8 ऑगस्ट 2020 पासून यावर तपास झालेला नाही

  • यानंतर हा सगळा अहवाल गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना देण्यात आला

  • यानंतर काही जणांचे फोन टॅप करण्यात आले. यावेळी खळबळजनक संभाषणं संपूर्ण समोर आलं.

  • 2017 साली एका हॉटेलमध्ये डिलिंग होत असल्याचं समोर आलं होतं. तेव्हा काही जणांना पकडलं होतं.

  • फोन टॅपिंगच्या डेटाचा पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांकडून सादर

  • पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये देवाणघेवाण

  • देशमुखांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय

  • पवार साहेबांना योग्य माहिती दिली गेली नाही, त्यामुळे त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बाहेर आली.

  • हे गेले आहेत की नाही यावर दावा करणार नाही पण हे कागद माझ्या हाती लागले आहेत.

  • 24 फेब्रुवारी 2021 11 वाजता अनिल देशमुख निवासस्थान ते मंत्रालय

  • 17 फेब्रुवारी 2021 ३ वाजता अनिल देशमुख सह्याद्री येथे आगमन

  • पोलिसांची मुव्हमेंट असते. त्याचे कागद आहे

  • पण तसं नाही ते त्या काळात मुंबईत होते.

  • पवारांच्या ट्विटवरुन असं दिसतं की, देशमुख हे नागपूरमध्ये क्वॉरंटाइन होते.

  • परमबीर सिंग यांचे दावे खोटे आहेत असं पवारांनी म्हटलं आहे.

  • पवार साहेबांनी हा विषय राष्ट्रीय केलेला असल्याने तमाम मराठी पत्रकार आणि माय मराठीची माफी मागून हिंदीमध्ये पत्रकार परिषद सुरु करणार आहे.

  • देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरु

    follow whatsapp

    ADVERTISEMENT