औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इसरार चिश्ती, औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील किर्ती मोटे हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. ही ऑनर किलिंगची घटना प्रचंड भयंकर असल्याचं आता समोर आलं आहे. किर्ती उर्फ किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. या गोष्टीचा राग मनात धरुन मुलीच्या आईने आणि अल्पवयीन भावाने अत्यंत निर्घृण प्रकारे तिची हत्या केली.

दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणी किर्तीचा पती अविनाश थोरे याने ‘मुंबई Tak’शी बोलताना त्या दिवशी नेमकी काय घटना घडली हे जसंच्या तसं सांगितलं आहे.

किर्तीची हत्या कशी झाली?, पतीने सांगितेला घटनाक्रम जसाच्या तसा:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘त्या दिवशी माझी तब्येत खराब होती.. आम्ही दोघं ना वावरात कांदे खुरपत होतो. तर मी तिला म्हटलं की, मी घरी जातो माझी तब्येत काही बरी नाही. मी घरी जाऊन झोपतो.. तुला जोपर्यंत काम करायचंय तोपर्यंत कर.. नंतर घरी निघून ये. मग मी घरी येऊन झोपलो. थोड्या वेळाने मला घरात कुणीतरी आल्यासारखं वाटलं.’

‘मी झोपेतच होतो… तर ती म्हणाली की, मम्मी आणि दादा आले. मला असं वाटलं की, त्या दिवशी तिची मम्मी येऊन गेली होती.. म्हटलं सगळं व्यवस्थित होतं.. मला वाटलं प्रेमाने आले असतील. त्यामुळे मला वाटलं गप्पा मारतील, चहा घेतील आणि जातील. काही वेळाने ती चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली ते पण किचनमध्ये गेले.’

ADVERTISEMENT

‘थोड्या वेळाने मला डब्बे पडल्यासारखा आवाज आला. म्हणून मी बघायला गेलो. मला वाटलं की, ती खुर्चीवरुन वैगरे पडली की काय. मी आत पाहिलं तेव्हा तिच्या मम्मीने तिचे पाय पकडले होते आणि भाऊ कोयत्याने वार करत होता.’

ADVERTISEMENT

‘मी स्वंयपाकघरात पोहचेपर्यंत तिला तोडलंच होतं. तरी पण मी पुढे गेलो. त्याने माझ्यावर कोयता उगारला. त्यामुळे मी पटकन बाहेर आलो. बाहेर आल्यावर मी माझ्या काकीला हाक मारली. माझा आवाज ऐकून काकीही बाहेर आली. तोपर्यंत तिचं मुंडकं घेऊन बाहेर आला व्हरांड्यावर.. त्याने मोबाइल काढून मोबाइलमध्ये सेल्फी घेतली नंतर ते खाली ठेवून दिलं.’

‘नंतर त्याची आई त्याला म्हणाली की, आतमधून कोयता घेऊन ये. मग तो आत गेला आणि त्याने आत जाऊन कोयता आणला आणि मग ते निघून गेले. या संपूर्ण घटनेनंतर पोलीस तासाभराने आले इथे.’

‘आम्ही इथून बसमध्ये सोबत जायचो कॉलेजला. त्यावेळी आम्ही एकमेकांशी बरंच बोलायचो. कधी-कधी ती तिची मोटर बाइक देखील घेऊन यायची कॉलेजला. ती दोन महिन्याची गर्भवती पण होती.’

’21 जूनला आमचं लग्न झालं होतं आळंदीला. त्यानंतर जवळजवळ 1 महिना आम्ही बाहेरच होतं. एक महिन्याने आम्ही घरी परत आलो. माझ्या घरातल्या लोकांना या लग्नाबाबत काहीही आक्षेप नव्हता.’

भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्…; धडावेगळं केलेलं शीर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला ‘पाहा, हिचं काय केलं’

‘पण मुलीच्या कुटुंबीयांना असं वाटलं की, मुलीने पळून लग्न केल्याने त्यांची इज्जत गेली म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. आम्ही एकाच समाजातील होतो. पण आता त्यांच्या मनात काय होतं हे त्यांचं त्यांनाच माहित.’

‘आम्ही जवळजवळ 2.5 वर्ष रिलेशनमध्ये होतो. त्यानंतर आम्ही ठरवलं की, लग्न करुयात. जेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं तेव्हा मी तिला आधीच सांगितलं होतं की, घरातून काहीही घेऊन यायचं नाही. तू फक्त एकटी ये.’

‘ती बारावीपर्यंत शिकली होती. कारण तिच्या घरच्यांना माहित पडलं होतं आमच्या अफेअरबाबत. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचं कॉलेजला जाणं बंद करुन टाकलं होतं. त्यामुळे लग्नाबाबत आम्ही काही तिच्या कुटुंबीयांना विचारलं नाही. कारण विचारलं असतं तरीही त्यांनी नकारच दिला असता हे मला माहिती होतं.’

किर्ती मोटे हत्याकांड : वडिलांनी किर्तीला घेऊन दिली होती बुलेट, ऑनर किलिंगचा आणखी एक ‘सैराट’ अँगल समोर

‘आम्ही दोघे गावात जेव्हा लग्न करुन परतलो होतो. त्यानंतर अनेक महिने ते लोकं आमच्याशी एकही शब्द बोलले नाही. फक्त आता आठ दिवसांपूर्वी तिची आई इथे येऊन गेली होती. तेव्हा तिने माझ्या बायकोशी प्रेमाने संवाद साधला होता. तेव्हा ती म्हणाली होती, मुली आता सगळं ठीक झालं आहे. बाबा तुला काहीही बोलणार नाही. आता घरी आलीस तरी चालेल. असं ती बोलून गेली होती.’

‘दरम्यान, घटनेच्या दिवशी तिच्या आईने माझ्या बायकोला फोन केला आणि असं म्हटलं की, ‘मी तुझ्यासाठी तूप आणलं आहे. तू इकडे मळ्यात ये.’ पण मी तिला जाऊ दिलं नाही. त्यामुळे तिची आई आणि भाऊ हे थेट आमच्या घरी आले.’ असा सगळा घटनाक्रम किर्तीचा पती अविनाश थोरे याने सांगितला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT