जगाचा विनाश जवळ आलाय? किलर रोबोट्स ते ब्लॅक होल… 10 गोष्टी घेणार पृथ्वीचा घास

मुंबई तक

ADVERTISEMENT

how would will end apocalypse earth destroy
how would will end apocalypse earth destroy
social share
google news

How would will end apocalypse : जगाचा अंत होणार आहे, याबाबत आतापर्यंत अनेक भाकीते वर्तवण्यात आली आहेत. या भाकीतांवर अनेक सिनेमे देखील बनवण्य़ात आली. हे सिनेमे पाहून मनुष्याने जगाचा अंत देखील पाहिला. तसेच गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी देखील आली होती. या महामारीतून मनुष्य सावरला आणि तरीही जग सुरळीत चाललंच आहे. मात्र कोरोनाचा धोका टळला असला तरी जगावर असे अनेक धोके आहेत. या धोक्यांमुळे जगाचा अंत होणार असल्याचे भाकीते वर्तवण्यात आली आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्ती आणि महामारी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात. (how would will end apocalypse earth destroy killer robots aliens attack 10 reason behind)

जगाच्या अंत करणाऱ्या भाकितांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यापुर्वी डुम्सडे क्लॉक बाबत जाणून घेऊयात. हे एक प्रतिकात्मक घड्याळ आहे. जे मानवी क्रियाकलापाद्वारे नैसर्गिक आपत्तीची माहिती देते. या घड्याळाला रात्री 12 वाजता धोक्याची घंटा म्हणून पाहिले जाते. 1945 ला जपानवर परमाणू हल्ला झाल्यानंतर जगाला मानवनिर्मित धोक्यापासून सावध करण्यासाठी या घड्याळाची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये रात्री 12 ची वेळ दाखवली की जगाचा अंत अगदी जवळ आल्याचे बोलले जात आहे. आता जाणून घेऊयात 10 कारणे ज्यामुळे जगाचा अंत होणार आहे.

महाकाय उल्का

डायनोसोरच्या अंताचा कारण ठरलेला उल्का जगाचा अंत करू शकतो. Chicxulub उल्का समुद्रात येऊन पडला होता. त्यानंतर त्या जागेला मेक्सिको खाडी असे नाव पडले. हा उल्का पडल्याने मोठी त्सुनामी आली होती. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आकाशात धुळींचे ढग तयार झाले होते, आणि हवामान बदलाचा वेग वाढला होता. हा उल्का पडल्यामुळे धऱतीवरील 75 टक्के प्राणी आणि झाडांच्या प्रजाती नष्ट झाल्या होत्या. महाकाय उल्का 100 दशलक्ष वर्षात एकदाच ग्रहाला टक्कर देतो, आता अशा घटनेची पुनरावृत्ती 30 दशलक्ष वर्षात होण्याची शक्यता आहे, असे खगोल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किलर रोबोट्स

यंदाच्या वर्षात आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI)चा विकास झाला. या सिस्टमचा मनुष्याला धोका आहे की फायदा आहे, यावर नेहमीच वाद झाला आहे. तज्ज्ञांनी याला मोठा धोका देखील मानले आहे. हे प्रकरण त्यावेळेस जास्त गंभीर झाले, ज्यावेळी 1000 हून अधिक टेक टायकून्सनी एका लेटरवर सह्या करून AI ला बनवणाऱ्या धोकादायक शर्यतीला संपवण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केली होती. मनुष्याचे तंत्रज्ञानावरील नियंत्रण सुटण्याआधी आणि रोबोटमुळे मानव नष्ट होण्यापुर्वी तातडीचे पाऊल उचलण्याची गरज आहे.

ज्वालामुखी (सुपर वॉलकॅनो)

ज्वालामुखी हा मानवी अस्तित्वासाठी सर्वांत मोठा नैसर्गिक धोका आहे.ही घटना दर एक लाख वर्षांनी घडते. अमेरीकेच्या व्योमिंग येलोस्टोन नॅशनल पार्कला ज्वालामुखीचा हॉटस्पॉट म्हटले जाते. जो गेल्या 2.1 मिलियन वर्षात तीन वेळा फाटला आहे. तज्ज्ञानुसार,जर पुन्हा एकदा ज्वालामुखी फाटला तर, त्यामधून निघणारा लावा 40 मैल दुरपर्यंत जाईल आणि विषारी वायू आकाशात पसरेल.

ADVERTISEMENT

एलियन्स

एलियन्सकडून देखील मानवाला धोका आहे. तज्ज्ञानुसार, खरा धोका तेव्हा आहे, जेव्हा इतर जगातील लोक पृथ्वीवर पोहोचतील. त्यांच्याकडे इतके प्रगत तंत्रज्ञान असतील की मानवाला स्वत:चा बचाव करता येणार नाही.

ADVERTISEMENT

पृथ्वी

रिपोर्टनुसार, सुर्याचं इंधन संपल्यावर तो केवळ धरतीच नव्हे तर बुध आणि शुक्र ग्रहांना गिळंकृत करेल. ही घटना 5 अब्ज वर्षात तरी होणार नाही आहे.

चुंबकीय क्षेत्र

ऐतिहासिकदृष्ट्या पृथ्वीचे उत्तरी आणि दक्षिण ध्रुव दरवर्षी 200,000-300,000 वर्षात सरकतात. अशी घटना 780,000 वर्षापुर्वी घडली होती. तज्ज्ञानुसार अशा घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. जर हे क्षेत्र पुर्णपणे उलटले तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पुर्णपणे कमकुवत होईल किंवा नष्ट होईल. ही मोठी गोष्ट आहे. कारण पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ओझोनच्या थरापासून संरक्षण करण्यासाठी अडथळ्याचे काम करते.

वैश्विक महामारी

जगात दोन वर्षापुर्वी कोरोनाने हाहाकार माजवला होता. या आजारावर नंतर वॅक्सिन बनवण्यात आली आणि कोरोना रोखण्यात यश आले. अशीच एक महामारी पुन्हा येण्याची शक्यता आहे. या महामारीत मानवजात नष्ट होण्याची शक्यता आहे.

ब्लॅक होल

ब्लॅक होल ही अशी गोष्ट आहे, जी सर्व गोष्टींना गिळंकृत करते. मग तो उजेडच का असेना. शास्र्ज्ञ यावर अजूनही अभ्यास करतायत. नुकत्याच एका ब्लॅक होलची माहिती मिळाली आहे. सध्या याचा काही धोका नाही, मात्र जर हा ब्लॅक होल पृथ्वीजवळ आला तर ते धोकादायक होऊ शकते.

आण्विक युद्ध

अणु युद्ध हा पृथ्वीवरील सर्वात मोठा धोका आहे. उत्तर कोरीयाचा हुकुमशाह किम जोंगने आण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. रशिया आणि युक्रेन युद्धात अनेकदा त्यांनी या हल्ल्याची माहिती दिली होती. जर असा हल्ला झाला तर त्याचा प्रभाव ह्ल्ल्याच्या ठिकाणापासून दूरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल वॉर्मिग

ग्लोबल वॉर्मिग म्हणजे जागतिक तापमानवाढीला मोठा धोका म्हणून पाहिले जात आहे. जर तत्काळ यावर पाऊल उचलले नाही तर मानवाचा मृत्यू होईल. धरतीचे तापमान वाढते आहे. थंड दिवसांची संख्या कमी झाली असून गरमीच्या दिवसांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षात जंगलात आग लागल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. ज्यामागच प्रमुख कारण वाढते तापमान असे म्हटले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT