Balasaheb Thackeray: CM शिंदे म्हणाले, ‘मी आज फक्त बाळासाहेबांमुळेच..’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Cm Eknath Shinde Press Conference Mumbai Balasaheb Thackeray: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज (23 जानेवारी) जयंती साजरी केली जात आहे. मात्र, यावेळी देखील शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गट बाळासाहेबांची जयंती साजरी करताना एकमेकांवर कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेने (Shiv Sena) (UBT) आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून (Saamana) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केली आहे. पण जेव्हा याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी यावर काहीही न बोलणं पसंत केलं. मात्र, बाळासाहेबांबद्दल मुख्यमंत्री भरभरून बोलले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (i am chief minister of state today only because of balasaheb thackerays blessings see what cm shinde said)

‘माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन.. त्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. माझ्या आयुष्यात सगळं योगदान बाळासाहेबांचंच आहे. एकही क्षण असा जात नाही की, त्यांची आठवण येत नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलं.

पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांबद्दल काय म्हणाले:

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा जन्मदिवस म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना एक आनंदाचा दिवस असतो. त्यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करत होतो. आज देखील अनेक ठिकाणी त्यांच्या या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत. अनेक आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील… अनेक समाजाभिमुख उपक्रम आज सुरू होत आहे. आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात देखील बाळासाहेबांचं तैलचित्र देखील आम्ही लावणार आहोत. अध्यक्ष महोदयांना आम्ही धन्यवाद देतो की, त्यांनी एक चांगला निर्णय घेतला. ज्यांचं योगदान फक्त राज्यात नाही तर देशभरात होतं. जगभरात बाळासाहेबांची किर्ती पसरली. अशा या व्यक्तिमत्वाच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे.’

‘शिवसेनाप्रमुखांमुळेच.. बाळासाहेबांमुळे सर्वसामान्य कार्यकर्ते आज मोठमोठ्या पदांची जबाबदारी स्वीकारत आहेत. माझ्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होऊन.. त्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी आदरणीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘माझ्या आयुष्यात सगळं योगदान बाळासाहेबांचंच आहे. एकही क्षण असा जात नाही की, त्यांची आठवण येत नाही. कारण त्यांनी जो काही आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवला आहे. जी काही शिकवण आहे त्यांची सर्वसामान्य माणसाला न्याय देणं. बाळासाहेबांचा एक मूलमंत्र होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आमचे सरकार हाच मूलमंत्र घेऊन काम करत आहे.’

‘बाळासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा विचार करतोय. त्यांच्या विचारावरच आधारित हे सरकार आहे. थोड्याथोडक्या कालावधीत आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत.’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

मात्र, यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना सामनातील अग्रलेखावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा मात्र, त्यांनी त्यावर काही भाष्य न करता पत्रकार परिषद संपवली.

ADVERTISEMENT

Balasaheb Thackeray Portrait : शिंदे-ठाकरे एकत्र येण्याचा योग टळणार!

‘सामना’तून मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका

‘सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते.’

‘गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत.’

‘मोदी यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर फक्त भाजपचाच बोलबाला होता. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांना मोदींच्या समोरच भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची खरी जागा कशी दाखवली याचे चित्रीकरण समोर आले. भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवला आहे व त्या कोल्हय़ास काडीमात्र किंमत नाही. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याने व्यासपीठावर जो अपमान सहन केला, अशांना बाळासाहेबांचे कटआऊट वगैरे लावून ढोंगबाजीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही.’

“तिथेच या हराम**** राजकीय चिता पेटेल, हीच बाळासाहेबांना आदरांजली” -सेना

‘लाचारी व गुलामीची हद्द पार करीत त्यांनी भाजपच्या व्यासपीठावरूनच जाहीर केले, ‘‘होय, होय, आम्ही मोदींची म्हणजे मोदींची माणसं आहोत?’’ इतके सर्व स्पष्ट झाल्यावर लोकांना कळलेच असेल की, शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप व त्यांच्या हस्तकांनी रचले होते.’

‘मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे व उद्याचे भविष्य शिवसेनेचे आहे या विचाराचा निर्धार आजच्या दिवशी करणे गरजेचे आहे. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण आपला बाप व पाठीराखा दुसराच कोणी असल्याचा दावा त्यांनी परदेशात केला.’

‘मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. वाघांच्या झुंडीत शिरलेली आम्ही मेंढरं आणि कोल्हे होतो. आम्ही वाघाचे कातडे पांघरून तेथे होतो, पण ईडी वगैरे लोकांनी आमचे कातडे ओढून काढले. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला.’

‘बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हराम*** राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली.’ अशा जहरी शब्दात शिवसेनेने (UBT)मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT