झारखंड-त्रिकूट रोपवे दुर्घना : २० तासांपासून हवेत लटकले ४८ लोक, बचावकार्यात अडथळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झारखंडमधल्या सर्वात उंच रोपवेवर दुर्घटना घडल्याने गेल्या २० तासांपासून ४८ जण हवेत लटकले आहेत. रविवारी संध्याकाळी ५ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. त्रिकूट रोपवेच्या दोन ट्रॉलीज एकमेकांमध्ये धडकल्या. त्यानंतर हे लोक एका डोंगरावर अडकले. रात्रीपासून एनडीआरएफचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसंच लष्कराचीही मदत बोलावली गेली. मात्र अद्यापही हे लोक त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची सुटका करण्यात यश आलेलं नाही.

रविवारी सकाळी रामनवमीची पूजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी शेकडो पर्यटक आले होते. रोपवे ची एक ट्रॉली खाली येत होती आणि तेव्हाच एक ट्रॉली वरती जात होती. या ट्रॉलींची टक्कर झाली. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले. जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा दोन डझन म्हणजेच २४ ट्रॉली हवेत होत्या. घाईगडबडीने काही लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेला २० तास उलटून गेले आहेत. तरीही ४८ जण हवेतच लटवकले आहेत. हे सगळेजण १८ ट्रॉलींमध्ये आहेत. लष्कराचं हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहचलं मात्र हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वेगाने १८ ट्रॉलीज हलू लागल्या. त्यामुळे आता या ट्रॉलीजमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव धोक्यात आला आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणी जिल्हा कलेक्टर मंजूनाथ भैजंत्री यांनी सांगितलं की सध्या आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून रोपवे बंद ठेवला आहे. ट्रॉली सरकल्याने दुर्घटना झाली. जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जे लोक अडकून पडले आहेत त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना NDRF ची मदत पाठवण्यात आली आहे. तसंच लष्करालाही पाचारण करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

कशी घडली दुर्घटना?

रोपवेच्या तीन ट्रॉलींची टक्कर झाली. त्यामुळे वरती गेल्या इतर ट्रॉलीही हलल्या. काही ट्रॉली दगडालाही जाऊन धडकल्या. यानंतर ही दुर्घटना घडली आहे. अनेक जखमींना रूग्णालयात दाळ करण्यात आलं आहे. इतर लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT