महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून अधिक Corona रूग्ण, 170 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 654 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात 3301 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत 62 लाख 55 हजार 451 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.2 टक्के इतका झाला आहे. राज्यात दिवसभरात 170 मृत्यूंची नोंद […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 654 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात 3301 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत 62 लाख 55 हजार 451 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.2 टक्के इतका झाला आहे. राज्यात दिवसभरात 170 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 32 लाख 56 हजार 24 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 47 हजार 442 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 92 हजार 733 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. 2337 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 51 हजार 574 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 4 हजार 654 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 47 हजार 442 झाली आहे.
Corona Curfew : रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात पुन्हा लागणार ‘नाईट कर्फ्यू’?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मागील आठवड्यातील रूग्णसंख्या
26 ऑगस्ट : 5 हजार 108 नव्या रूग्णांचं निदान झालं. 4 हजार 736 रूग्ण गुरूवारी बरे होऊन घरी गेले. तर 159 मृत्यूंची नोंद झाली.
ADVERTISEMENT
25 ऑगस्ट: राज्यात 5 हजार 31 नवे कोरोनाबाधित आढळले होते. 4 हजार 380 रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर 216 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT
24 ऑगस्ट: राज्यात 4 हजार 355 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. 4 हजार 240 रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर 199 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली होती.
23 ऑगस्ट: राज्यात 6 हजार 795 रूग्ण कोरोनातून बरे झाले होते. तर 3 हजार 643 नवीन करोनाबाधित आढळून आले होते. तर, 105 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता.
22 ऑगस्ट: राज्यात 4 हजार 141 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर 145 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 4 हजार 780 कोरोना रुग्णांनी करोनावर मात केली होती.
21 ऑगस्ट: राज्यात दिवसभरात 145 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. तर, 4 हजार 575 नवीन कोरोनाबाधित आढळून आले होते. याचबरोबर 5 हजार 914 रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले होते.
ADVERTISEMENT