मुंबईत नव्या गाईडलाईन्स, सोमवारपासून काय होणार Unlock जाणून घ्या

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे. वाढलेला रिकव्हरी रेट आणि कमी झालेली पॉझिटिव्ह रूग्णांची तसंच सक्रिय रूग्णांची संख्या हेच सांगते आहे. अशात राज्य शासनाने Unlock चा निर्णय घेतला. शासनाच्या ब्रेक द चेनच्या आदेशानुसार मुंबई तिसऱ्या श्रेणीत येत असल्याने त्यानुसार नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शहरातील विविध गोष्टींना संमती देण्यात आली असली तरीही सामान्यांसाठी मुंबई लोकल बंदच राहणार आहे. अनलॉकचे नवे नियम ७ जून म्हणजेच सोमवारपासून लागू होतील.

मुंबई लोकल येत्या काही दिवासंमध्येही फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच सुरू राहणार आहे. नव्या आदेशांमध्ये Women हा शब्द वगळण्यात आला आहे. शहर अनलॉक करण्याच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या लेव्हलवर आहे त्यामुळे सोमवारपासून सरसकट सगळे निर्बंध उठवले जाणार नाहीत.

मुंबईत काय काय सुरू होणार जाणून घेऊ..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागरिकांना पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत मॉर्निंग वॉक, सायकलिंग करण्यास संमती देण्यात आली आहे

खासगी कार्यालयं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास संमती

ADVERTISEMENT

बेस्ट बसमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार मात्र बेस्टमध्ये उभं राहून प्रवास करण्यास मनाई

ADVERTISEMENT

रेस्तराँ, सलून, स्पा हे सगळं काही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी एसी सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे

सर्व दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील आणि शनिवार रविवार बंद राहतील

काय बंद राहणार आहे?

लोकल सामान्यांसाठी बंद राहणार आहे

संध्याकाळी पाचनंतर शहरात संचारबंदी असणार आहे

रेस्तराँ उघडण्यास संमती देण्यात आली असली तरीही मॉल्स आणि सिनेमागृहं, नाट्यगृहं बंद राहणार आहेत

मुंबई लोकलबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे?

मुंबई लोकल प्रवासाच्या संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकलच्या संदर्भात मुंबई महापालिका जे नियम लागू करेल तेच नियम MMR रिजनमधल्या इतर महापालिकांनाही पाळणं बंधनकारक असणार आहे. दुसऱ्या महापालिकांना लोकल प्रवासासंदर्भात काही वेगळे नियम तयार करायचे असतील तर त्यांना मुंबई महापालिकेशी चर्चा करावीच लागेल असं आता सरकारने म्हटलं आहे.

मुंबई शहर आणि उपनगरं अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात येतात. त्यामध्ये MMR रिजनमध्ये येणाऱ्या शहरांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत. MMR रिजनमध्ये येणारी काही शहरं लेव्हल वन मध्ये येतात तिथे ट्रेन सुरू करायची असल्यास काय? मार्ग असेल हे आता राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT