चोर आले रे… अफवेनं उडवलीये शहरवासियांची झोप! लोकांना करावं लागतंय रात्रभर जागरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चोर आल्याच्या एका अफवेनं नांदेड जिल्ह्यातील लोहा शहराची झोप उडवली आहे. लोहा शहरात सध्या रात्री चोर येत असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, शहरवासियांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. नागरिकांबरोबरच पोलिसांची देखील या अफवेने झोप उडवली आहे.

मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नांदेडमधील लोहा शहरात मागील काही दिवसांपासुन लोकांची झोप उडाली आहे. लोकांच्या जागरणाला कारणीभूत ठरली आहे एक अफवा. अफवा आहे, शहरात चोर आल्याची!

भयंकर! माथेरानमध्ये सापडला महिलेचा शिर नसलेला मृतदेह

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ही अफवा पसरण्यामागे कारण ठरलं आहे, चोरीच्या वाढत्या घटनांचं. शहरात मागील काही महिन्यांपासून चोऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. चोरीच्या या घटनांनी चोर आल्याच्या अफवांना खतपाणी घातलं असून, अफवेचा विषय चांगलाच चर्चेत आहे.

रात्रीला चोर येत असल्याच्या याच भीतीने आता लोहा शहरातील नागरिकांचा निद्रानाश सुरू आहे. लोक अख्खी रात्र-रात्र जागून काढत आहेत. जागते रहो… जागते रहो, अशा उद्घोषणाही इंदिरा नगर येथील नागरिक देत आहेत.

ADVERTISEMENT

आठवडाभरापूर्वी काय झालं होतं?

ADVERTISEMENT

लोहा शहरात आठवडाभरापूर्वी एक घटना घडली होती. एका महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एक हत्येची घटना घडली. एका तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांनंतर नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झालं. पोलीस अपेक्षित मदत करत नसल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.

Nagpur Crime : बर्थ-डे पार्टीत धक्का लागल्याचं निमीत्त, तरुणावर प्राणघातक हल्ला

कधी इंदिरा नगर, तर कधी तळ्याकडे चोर पळाले, अशी चर्चा नागरिक रात्रीच्या वेळी करीत असतात. आता या अफवांमुळे नागरिकांबरोबरच पोलिसांचीही धावपळ होऊ लागली आहे. आता पोलिसांकडूनच चोर असल्याच्या केवळ अफवा असल्याचं सांगितलं जात आहे. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेव नये, असे आवाहन आता पोलिसांकडून केलं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT