JD(U)MLAs : 2024 च्या तयारीला लागलेल्या नितीश कुमारांना भाजपने दिला आणखी एक झटका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कमळाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलांसोबत (RJD) सत्ता स्थापन करणाऱ्या नितीश कुमारांना इतर राज्यात भाजपने सलग दुसरा झटका दिलाय. बिहारमधील सत्तांतरानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भाजपने बिहारमधील वचपा काढत दुसरा धक्का नितीश कुमारांच्या जदयूला दिला.

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमारांनी राजदसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता भाजपने नितीश कुमारांच्या जदयूला अरुणाचल प्रदेश पाठोपाठ मणिपूरमध्येही धक्का दिला.

नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाचे सहा पैकी पाच आमदार भाजपत दाखल झाले आहेत. रात्री उशिरा घडलेल्या या राजकीय भूंकपाचे हादरे मणिपूर बरोबरच बिहारमध्येही जाणवले. जदयूने यावर टीका करताना हे असंवैधानिक असल्याचं म्हटलंय, तर भाजपनं आमदारांचं स्वागत केलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

MLAs join BJP : जदयूला मणिपूरमध्ये झटका

मणिपूर विधानसभेचे सचिव मेघजीत सिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार जदयूच्या पाच आमदारांचा भाजपातील प्रवेश स्वीकृत करण्यात आला आहे. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार स्वीकारलं गेलं आहे.

मणिपूरमध्ये याच वर्षी (२०२२) विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. जदयूने ३८ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ६ जागांवर जदयूचे उमेदवार जिंकले. मात्र, आता सहापैकी ५ आमदार भाजपत गेले आहेत. त्यामुळे जदयूला हा मोठा झटका मानला जात आहे.

ADVERTISEMENT

जदयूच्या कोणत्या आमदारांनी भाजपत प्रवेश केला?

जनता दलाच्या (संयुक्त) ज्या पाच आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे, त्यांची नावं केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछबउद्दीन, पोलीस महासंचालक राहिलेले आमदार एएम खाऊटे आणि थांगजाम अरुण कुमार अशी आहेत.

ADVERTISEMENT

बिहारमध्ये नितीश कुमारांचा खेळ

बिहारमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर जदयू आमदार भाजपत जाण्याची ही दुसरी घटना आहे. मणिपूरमध्ये जदयूचे सहापैकी पाच आमदार भाजपत गेले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशही असाच झटका जदयूला बसला.

२०१९ मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाने १५ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी जदयूचे ७ उमेदवार निवडून आले होते. मात्र, ७ पैकी ६ आमदारांनी डिसेंबर २०२० मध्ये म्हणजेच जदयू आणि भाजपचं बिहारमध्ये सरकार असतानाच भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर उरलेल्या एका आमदारांनेही काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला.

बिहारचा वचपा भाजपने ईशान्येत काढला : नितीशकुमारांचा अख्खा पक्षच संपवला…

मणिपूरमध्ये आमदारांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर जदयू काय म्हणाली?

मणिपूरमध्ये सहापैकी ५ आमदार भाजपत गेल्यानंतर जदयूने टीका केली आहे. हे असंवैधानिक असल्याचं जदयूकडून म्हटलं जात आहे. असं असलं तरी मणिपूर विधानसभेच्या सचिवांनी जदयू आमदारांच्या पक्षांतराला मंजुरी दिली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ : नितीश कुमार विरुद्ध नरेंद्र मोदी

राजकीय पक्षांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी पक्षबांधणी सुरू केली आहे. बिहारमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर आता २०२४ मध्ये नितीश कुमार हे विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. जदयूकडूनही तसेच संकेत दिले जात आहे. जदयू नेत्यांकडूनही नितीश कुमार विरुद्ध नरेंद्र मोदी असंच चित्र उभं केलं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT