Old Pension Scheme : शिक्षक संपावर; विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Old Pension Scheme News :

चंद्रपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्ण, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतं असल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूरमध्ये शिक्षकांच्या संपाविरोधात संपामुळे विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत. “जो पर्यंत शिक्षक शाळेत येत नहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहिलं असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. (Old Pension Scheme : Students protest as teachers are on strike)

नेमकं काय घडलं?

चंद्रपुर जिल्यातील वरोरा तालुक्यातील आसाळा गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची मुलं शिक्षक पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षक संपावर आहेत, शाळेत शिकवायला येत नाहीत, आमच्या अभ्यासाचे नुकसान होतं, म्हणून विद्यार्थ्यांनी गावात चक्काजाम आंदोलन सुरु केलं असून, गावातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आसाळा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आसाळा गावातील वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी विद्यार्थी मुलांनी शिक्षकांच्या विरुद्ध घोषणा देत त्यांना शाळेत लवकर येण्याची विनंती केली आहे. गावातील पालक समितीचे अध्यक्ष आणि गावकरी मुलांच्या या आंदोलनात सहभागी असून शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होतं आहे.

Old Pension Scheme : जुनी पेन्शन सुरू होणार? मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

ADVERTISEMENT

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. मात्र सार्वत्रिक प्रतिक्रिया बघता हा संप सामान्य जनतेला पटलेला नाही असं चित्र आहे.

ADVERTISEMENT

OPS : विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजर असलेली ‘जुनी पेन्शन योजना’ काय आहे?

“शिक्षक संपात सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली, जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिक्षण घेतात. त्यात परीक्षा तोंडावर आहेत, ऐन परीक्षेच्या तोंडावर तरी किमान शिक्षकांनी अशी भूमिका घ्यायला नको होती, अशी भावना आसाळा गावातील पालकांनी व्यक्त केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT