परमबीर सिंहांना वाचवणं भाजपसाठीच गरजेचं; काँग्रेसनं उपस्थित केली शंका - Mumbai Tak - param bir singh fled from country congress slams modi government param bir singh latest updates - MumbaiTAK
बातम्या

परमबीर सिंहांना वाचवणं भाजपसाठीच गरजेचं; काँग्रेसनं उपस्थित केली शंका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह कुठे आहेत?, असा प्रश्न विचारला जात असून, यावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपला लक्ष्य करताना दिसत आहे. परमबीर सिंह बऱ्याच दिवसांपासून समोर आलेले नाहीत. त्यातच आता त्यांनी देशाबाहेर पलायन केलं असल्याची चर्चा सुरू झाली असून, असे लोक जेव्हा पळून जातात तेव्हा सरकार झोपलेलंच का असतं, अशी […]

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह कुठे आहेत?, असा प्रश्न विचारला जात असून, यावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपला लक्ष्य करताना दिसत आहे. परमबीर सिंह बऱ्याच दिवसांपासून समोर आलेले नाहीत. त्यातच आता त्यांनी देशाबाहेर पलायन केलं असल्याची चर्चा सुरू झाली असून, असे लोक जेव्हा पळून जातात तेव्हा सरकार झोपलेलंच का असतं, अशी शंका उपस्थित करत काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

परमबीर सिंह यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिलेले होते, असं सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची ईडी, सीबीआयकडून चौकशी सुरू असून, राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची नेमला आहे.

आयोगाने दोन वेळा समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीसाठी हजर न झाल्यानं ते कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता सिंह यांनी परदेशात पलायन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी ट्वीट करत काही शंका उपस्थित करत केंद्र सरकारला सवाल केला आहे.

“जर परमबीर सिंह भारत सोडून पळून गेले, हे सत्य असेल तर देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपची निश्चित भूमिका असणार आहे. परमबीर सिंहांना वाचवणं भाजपसाठीच गरजेचं आहे. सर्वात आधी एनआयएने Antilia प्रकरणाची चौकशी सुरू केली होती”, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेत; जयंत पाटील यांची धक्कादायक माहिती

“NIA च्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, वाझे परमबीरांना रिपोर्ट करत होता. परमबीर यांनी जैश-उल-हिंद या अतिरेकी संघटनेवर अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी ढकलण्यासाठी सायबर तज्ञाला 5 लाख रुपये दिले. तरीही परमबीर पळून गेले, तर ते NIA चे अपयश आहे. चौकीदार सरकार काय करत होते?”, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

“नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या आणि परमबीरसारखे लोक जेव्हा देश सोडून पळून जातात, तेव्हा चौकीदार सरकार सातत्याने झोपलेले का आढळते? हे झोपेचे सोंग उघड होऊन जनतेसमोर सत्य आल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव कधी होणार – राम कदम

महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाकडून भाजपवर केल्या जात असलेल्या आरोपांना भाजपचे नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारमधील नेते परमबीर सिंह देश सोडून पळून गेल्याचा दावा करत आहेत. मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारवर टीका करणे हा राज्य सरकारचा हा नियमच झाला आहे. सरकारला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव कधी होणार आहे?”, असा उलट सवाल कदम यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 4 =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!