शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो
बातम्या

शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो

दिल्ली-हरयाणाच्या बॉर्डरवर गेल्या ३ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारने आणलेले ३ कृषी कायदे मागे घेण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनावर अजून कुठला तोडगा निघताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांबदद्ल केंद्र सरकारबद्दल सर्वाधिक रोष असलेल्या पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली.

आजच्या निकालात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. तर कृषी कायद्यावरून एनडीएची साथ सोडणाऱ्या शिरोमणी अकाली दलासोबतच भाजपलाही मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागतंय.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीलाही पराभवाचं तोंड बघावं लागतंय.

जवळपास सगळ्याच पालिकांमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय, तर काही ठिकाणी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळालीय. आतापर्यंत लागलेल्या निकालातून शेतकरी आंदोलनाचा प्रभाव स्पष्ट झालाय.

आतापर्यंत आलेला निकाल पुढीलप्रमाणे-

बाटला नगरपालिका- काँग्रेस 35, अकाली दल 6, भाजप 4, आप 3, अपक्ष 1

मोगा नगरपालिका – काँग्रेस 20, अकाली दल 15, भाजप 1, आप 4, अपक्ष 10

कपूरथला नगरपालिका – काँग्रेस 43, अकाली दल 3, अपक्ष 2

पठाणकोट नगरपालिका – काँग्रेस 37, अकाली दल 1, भाजप 11, अपक्ष 1

अबोहर नगरपालिका- काँग्रेस 49, अकाली दल 1

अमृतसर जिल्ह्याचा निकाल

रमदास
काँग्रेस 8
अकाली दल 3

मजीठा
काँग्रेस 2
अकाली दल 10
अपक्ष 1

रइया
काँग्रेस 12
अकाली दल 1

अजनाला
काँग्रेस 7
अकाली दल 8

जंदियाला
काँग्रेस 19
अकाली दल 3
अपक्ष 2

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. एकूण ११७ पालिकांसाठी ९ हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आतापर्यंत जे निकाल हाती आलेत, त्यात भाजपला मोठा फटका बसल्याचं दिसतंय.

८ महापालिका आणि १०० हून जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी २,३०२ वॉर्डात निवडणूक झाली. गेल्या १४ फेब्रुवारीला यासाठी मतदान पार पडलं. ७० टक्क्याहून जास्त एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सत्ताधारी काँग्रेसनं २,०३७, तर विरोधी पक्षातल्या शिरोमणी अकाली दलानं १,५९६ जागांवर उमेदवार दिले. भाजपने १,००३, आम आदमी पार्टीने १६,०६ आणि बसपाने १६० जागांवर उमेदवार दिले होते. कृषी कायद्यामुळे शिरोमणी अकाली दलाने एनडीएपासून फारकत घेतल्याने भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − five =

Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!