रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र?
बातम्या

रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र?

टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मागणी करणा-या पोस्ट फिरत होत्या.

मोटिवेशनल स्पिकर डॉ.विवेक बिंद्रा यांनी सर्वात प्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड झाला. दिवसभर अनेकांनी पंतप्रधानांना टॅग करत रतन टाटा यांना रत्न पुरस्कार देण्याची मागणी करणारी ट्विट्स केली. पण आता खुद्द रतन टाटा यांनीच या ट्विट्सची दखल घेत त्यांच्या चाहत्यांना पत्र लिहिलं आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मोहिमच चालवली गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत रतन टाटा यांना रत्न पुरस्कार द्या, अशी मागणी केली जात होती. त्याचीच दखल घेत, लोकांचं प्रेम पाहून भारावून गेलेल्या रतन टाटा यांनी एक पत्र लिहून सर्वांचे आभार मानले आहेत. शिवाय आपल्याला भारतरत्न मिळावं म्हणून सुरू केलेलं कॅम्पेन थांबवण्य़ाची विनंतीही केली आहे.

आपल्या पत्रात ते लिहितात, मला रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो, पण मी विनंती करू इच्छितो की मला भारतरत्न मिळावा यासाठी सुरू असलेली मोहिम थांबवावी. मी भारतीय आहे हे माझं मी भाग्य समजतो, देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी मी माझं योगदान असंच देत राहिन.

त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिचा आदर व्यक्त करणा-या पोस्टमध्ये आणखीनच वाढ झाली असून याचसाठी तुमची ओळख प्रेमळ आणि सच्चा माणूस म्हणून करून दिली जाते, म्हणूनच आम्हाला तुमचा आदर वाटतो, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

यापूर्वीही रतन टाटा यांनी आपल्या कंपनीतील माजी कर्मचारी, जुने स्नेही आजारी असल्याचं कळल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी मुंबईवरुन थेट पुणे गाठलं होतं. या संदर्भातला फोटो व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर त्यांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं. कोणताही डामडौल नाही, गाजावाजा नाही सुरक्षा रक्षकांचा गराडा नाही की, मिडीयाची गर्दी नाही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे रतन टाटांनी ही भेट घेतली आणि सा-यांनाच सुखद धक्का दिला होता.

त्याच प्रमाणे आताही त्यांनी लिहिलेल्या या पत्रातून पुन्हा एकदा त्यांच्या साधेपणाचं दर्शन घडत आहे. रतन टाटा यांच नाव कायम त्यांच्या समाजपयोगी आणि मानवतावादी कामामुळे चर्चेत असतं. कोरोनाच्या काळातसुध्दा रतन टाटा यांनी मुक्त हस्ते मदत केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × five =

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त ‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट! CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी! नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का? IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं! Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण… IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल! Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर…; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी ‘वीर सावरकरां’च्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट! आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही ट्रोल बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला! Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा ‘ओरी’ कोण? महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, ‘जास्त पैसे असतील तर..’