Shivsena नेतृत्व कमजोर होतं का? पटोलेंचा राऊतांना सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shivsena | Sanjay Raut :

मुंबई : ठाकरे सरकार पडून आता ८ महिने उलटले आहे. मात्र अद्यापही हे सरकार कोणामुळे पडलं यावरुन महाविकास आघाडीतच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी हे सरकार पडण्यासाठी विधानसभेचे तत्कालिन अध्यक्ष आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं होतं. त्यांनी राजीनामा दिला नसता तर भाजपने संधी साधली नसती, असं म्हणतं त्यांनी पटोलेंवर निशाणा साधला होता. दरम्यान, यावर आता पटोले यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Shivsena | Sanjay Raut slams nana patole on mahavikas aaghadi government nana patole reply)

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले म्हणाले, मी संजय राऊत यांना धन्यवाद देतो की ते मला एवढे शक्तिशाली समजतात, की मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं. मी असतो तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं, अशा प्रकारचं वक्तव्य करुन ते माझ्या शक्तीची जाणीव करुन देत आहेत. माझ्या शक्तीचा परिचय त्यांनी देशाला करुन दिला आहे. पण जे पक्षाचे कोणी त्या खुर्चीवर बसले होते, तो पक्ष कमजोर होता का, ते नेतृत्व कमी पडत होता का? असं संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

PM in Mumbai: मोदींचा महिनाभरात दुसरा मुंबई दौरा! कुणाला करणार लक्ष्य?

कारण मला अधिकार संवैधिनीक होते. पण जे कोणी बसले असतील त्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं आणि नाही केलं याबद्दलही ते बोलतं नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांनी या प्रश्नाला वारंवार उपस्थित करुन महागाईचा प्रश्न संपणार नाही, बेरोजगारीचे प्रश्न संपणार नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत, छोटे उद्योजक संपत आहेत, अशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे, या प्रश्नावर लक्ष घातलं तर भाजपनं ज्या पद्धतीने खोक्यानं सरकार पाडली त्यावर त्यांना उत्तर दिलं जाईल.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते, संजय राऊत?

गुरुवार (९ फेब्रुवारी) सामनाच्या अग्रलेखात नाना पटोले यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. यात राऊत म्हणाले होते, महाविकास आघाडी सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणं आहेत. पण मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता आणि तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते.

ADVERTISEMENT

PM Modi: ‘एकटा किती जणांवर भारी पडतोय’, मोदींनी थेट छाती ठोकून ठणकावलं!

अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते आणि पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व त्याचाच फायदा पुढे ‘खोके’बाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील ‘महाशक्ती’स मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल, असं राऊत म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT