बूंद से गई? ठाण्यात बिल न देता रेल्वे मंत्र्यांचा नाश्ता,नंतर भाजप कार्यकर्त्यांची सारवासारव
– विक्रांत चव्हाण, ठाणे प्रतिनिधी वडापाव हे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो. राज्यातील कोणत्याही शहरात तुम्हाला वडापावचे स्टॉल जागोजागी दिसतात. गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून ते गर्भश्रीमंत व्यक्तींमध्येही या वडापावची क्रेझ आहे. परंतू हाच वडापाव भारताचे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलाच महागात पडला आहे. ठाणे येथील प्रसिद्ध गजानन वडापावमध्ये दौऱ्यातील कार्यक्रम […]
ADVERTISEMENT

– विक्रांत चव्हाण, ठाणे प्रतिनिधी
वडापाव हे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो. राज्यातील कोणत्याही शहरात तुम्हाला वडापावचे स्टॉल जागोजागी दिसतात. गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून ते गर्भश्रीमंत व्यक्तींमध्येही या वडापावची क्रेझ आहे. परंतू हाच वडापाव भारताचे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलाच महागात पडला आहे.
ठाणे येथील प्रसिद्ध गजानन वडापावमध्ये दौऱ्यातील कार्यक्रम संपल्यानंतर भाजप नेत्यांनी नाश्ता करुन बिल न देताच काढता पाय घेतला. ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी तात्काळ गजानन वडापाव दुकानात जाऊन दोन हजार रुपये देत संपूर्ण बील चुकतं केलं. परंतू पहिल्यांदा बील न भरता मंत्रीमहोदयांनी घेतलेला काढता पाय चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?










