Uddhav Thackeray यांच्या ‘भावी सहकाऱ्यांच्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या मधील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य दिवसभर गाजतं आहे. भाजपचा भावी सहकारी असा केलेला उल्लेख हा सूचक आहे आणि त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोडी जपून प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे’ असं अजित पवार यांनी म्हटलं […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या मधील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य दिवसभर गाजतं आहे. भाजपचा भावी सहकारी असा केलेला उल्लेख हा सूचक आहे आणि त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोडी जपून प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी ओळखू शकत नाही पण माझ्याशी जेव्हा ते संवाद साधतात तेव्हा आपल्याला राज्याला पुढे घेऊन जायचं आहे असंच ते म्हणतात.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातीलाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी’, असं म्हणत युतीचे दरवाजे खुले असल्याचे एकप्रकारे संकेतच दिले. ‘एकमेकांकडून अपेक्षा असणारच. अपेक्षाशिवाय आयुष्य असूच शकत नाही. आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या, तुम्ही आमच्या कडे व्यक्त करायच्या. पण रावसाहेब आज सर्वांच्यासमोर तुम्हाला शब्द देतो. जर तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल, तर हे सरकार तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर मजबुतीने उभे राहिल.’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याच वक्तव्याची चर्चा आज दिवसभर रंगली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय बोलावं ते आपण कसं सांगणार ते राज्याचे प्रमुख आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.









