बारामतीजवळ उसाने भरलेल्या ट्रॉलीला कारची धडक, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती

ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बारामतीतल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. बारामती पुणे रस्त्यावर तरडोली गावाजवळ बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.

या अपघातात बारामतीतले सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अश्विनी श्रेणिक भंडारी (वय 48), मिलिंद श्रेणिक भंडारी (वय 24), कविता उदय शहा (वय 62 रा. सर्व सुभाष चौक बारामती) यांचा समावेश आहे तर बिंदिया सुनील भंडारी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अपघाताबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारी कुटुंबीय एका धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. तिथून परतत असताना मंगळवारी रात्री उशिरा तरडोली गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली चा अंदाज न आल्याने भंडारी कुटुंबीयांच्या कारने ट्रॉलीला जोरदार धडक दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

गाडीची धडक जोरदार होती त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. श्रमिक भंडारी हे बारामतीतले सराफ व्यावसायिक आहेत. हे कुटुंबीय अत्यंत मनमिळावू आणि धार्मिक स्वभावाचे आहेत. त्यामुळे बारामतीकरांमध्ये शोककळा पसरली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT