राज ठाकरे पुन्हा म्हणाले… ‘मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (12 एप्रिल) ठाण्यातील ‘उत्तरसभेत’ पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांविरोधात राग आवळला आहे. ‘जर भोंगे खाली उतरवले नाही तर आम्ही तुमच्या मशिदीवर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच’ असं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे.

पाहा राज ठाकरे नेमके काय म्हणाले:

हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मशिदीवरील भोंग्यांचा त्रास अख्ख्या देशाला होतो आहे. यात धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे जी काय अजान द्यायची असेल ती घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते का अडवता? प्रार्थना तुमची आहे तर आम्हाला का ऐकवता. जर सांगून तुम्हाला समजत नसेल की, भोंगे खाली उतरवा.. तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..’ असं ठामपणे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे-राज ठाकरे

ADVERTISEMENT

‘एकदा काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे’

ADVERTISEMENT

‘वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत. हा धार्मिक विषय नाहीच आहे हा सामाजिक विषय आहे. सर्वांना या गोष्टीचा सकाळी त्रास होतो. दिवसभरातून पाच-पाच वेळा तुम्ही नमाज पडता. एक तर सगळे बेसूर असतात. काय म्हणून आम्ही ऐकायचं?’

‘रस्त्यावर घाण झाली तर आपण साफ करतो. फुटपाथवर घाण झाली तर फुटपाथ आपण साफ करतो. मग जर कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. आणि राज्य सरकारला आमचं सांगणं आहे की, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. ज्या देशांमध्ये बंदी आहे तिथे निमूटपणे ऐकता ना तुम्ही.’ असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याला विरोध केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन प्रमुख मागण्या, म्हणाले….

‘365 दिवस लाऊड स्पीकरमधून बांग कशासाठी?’

‘आज माझे अनेक मुसलमान परिचयाचे आहेत की, ते सांगतायेत की, तुम्ही म्हणतायेत ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे की, जो दुसऱ्या धर्मांना त्रास देतो. आज तुमचा रमजान सुरु आहे आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव सुरु असतो. दहा दिवसात आपण समजू शकतो. तरीही तो लाऊड स्पीकर कमीच लावलाच पाहिजे. तो भाग वेगळा.’

‘सण वार असेल तर आपण समजू शकतो. हे 365 दिवस जेव्हा तुम्ही लाऊड स्पीकरमधून या गोष्टी तुम्ही ऐकवता कशासाठी, कोणासाठी?’ असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी केलं आहे.

राज ठाकरे यांच्या याच भाषणानंतर आता मनसैनिक नेमकी कोणती भूमिका घेणार आणि राज ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT