एकनाथ खडसेंसाठी भाजपचे दरवाजे कायमसाठी झाले बंद?; चंद्रकांत पाटलांनी घरवापसीच्या चर्चेवर काय दिलं उत्तर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी मला आणि देवेंद्र फडणवीसांना एकत्र बसून मिटवून टाकू, असे म्हटल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजप नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ते जळगावमध्ये बोलत होते. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार असलेल्या खडसे यांना भाजपमध्ये परतीचे वेध लागले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश हा विषय वाटतो तितका सोपा नाही, असं पाटील म्हणाले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पत्रकारांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले एकनाथ खडसेंच जाणं आम्हाला सगळ्यांना दुःखदायक होतं. पण त्यांचं येणं इतका सोपा विषय असेल, असं मला वाटत नाही. कारण ते आता गेलेत, त्यांना आमदार केलंय. ज्या कारणांनी ते गेलेत, ती सगळी बसून चर्चा. त्यामुळं इतक्या घाईनं अपुऱ्या माहितीच्या आधारे मी बोलणं योग्य नाही. आमच्याकडे खूप चांगली कार्यपद्धती आहे. ज्याचा जो विषय आहे तो त्यानी करायचा, असं एकूण या विषयावर चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील अखिल भारतीय महानुभाव संमेलन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे एकाच मंचावर आले होते. परंतु कार्यक्रमात खडसे भाजप पदाधिकाऱ्यांपासून लांब बसल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितलं होतं. यामुळे नेमके खडसे यांनी फडणवीस यांच्या कानात काय सांगितलं असेल? याबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

ADVERTISEMENT

अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः खडसे काय बोलले होते याबद्दल खुलासा केला आहे. महाजन म्हणाले, भाषण झाल्यावर खडसे माझ्याजवळ आले आणि म्हणाले की एकदा आपण बसू, मिटवून टाका, जाऊद्या. त्यावर पत्रकारांनी खडसे यांना नेमकं काय मिटवायचं आहे असा सवाल महाजन यांना केला. तेव्हा महाजन म्हणाले, त्यांचं सध्या जे काय चाललंय त्यावरून त्यांचं काय मिटवायचं होतं ते गर्दी आणि गोंधळामुळे विचारता आलं नाही. पण आता बसल्यावर त्यांच्या मनात काय मिटवायचं आहे ते माहित नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT