काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा आज निकाल : मल्लिकार्जून खरगे की शशी थरूर, कोण जिंकणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ला आज नवा अध्यक्ष मिळेल. यावेळी निवडून येणाऱ्या अध्यक्षाबद्दलची महत्त्वाची बाब म्हणजे २४ वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेर व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष बनले होते. आता मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर निवडणूक लढवत असून, कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोघांमध्ये लढत होत असून, अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ९,९१५ हजार मतदारांपैकी ९,५०० निवडणूक मंडळाच्या सदस्यांनी मतदान केलं आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (१९ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता काँग्रेसच्या मुख्यालयात सुरूवात होणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा निवडणूक होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देशातल्या ६८ मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर सीलबंद मतपेट्या काँग्रेसच्या मुख्यालयातील स्ट्रॉंग रुममध्ये नेण्यात आल्या. या मतपेट्या उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर उघडल्या जाणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा इतिहास

१९३९ मध्ये जेव्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली, तेव्हा महात्मा गांधींच्या गटाचे उमेदवार पी. सीतारामैय्या हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून पराभूत झाले होते.

ADVERTISEMENT

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० मध्ये काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. तेव्हा पुरुषोत्तम दास टंडन आणि आचार्य कृपलानी यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या टंडन यांनी कृपलानी यांचा पराभव केला होता.

ADVERTISEMENT

१९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर देव कांत बरूआ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ब्रह्मानंद रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिद्धार्थ शंकर आणि करण सिंह यांचा पराभव केला होता.

सोनिया गांधी सर्वाधिक काळ राहिल्या काँग्रेस अध्यक्षपदी

पुढे २० वर्षानंतर म्हणजे १९९७ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सीताराम केसरी हे शरद पवार आणि राजेश पायलट यांचा पराभव करून अध्यक्ष झाले होते. सीताराम केसरी यांना ६,२२४ मतं मिळाली होती, तर शरद पवार यांना ८८२ आणि पायलट यांना ३५४ मतं मिळाली होती.

२००० मध्ये जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा गांधी कुटुंबातल्या व्यक्तीला आव्हान दिलं गेलं होतं. या निवडणुकीत सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद अशी लढत झाली होती. सोनिया गांधी यांना ७,४०० मतं मिळाली होती. तर प्रसाद यांना ९४ मतं मिळाली होती.

सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष पदी सर्वाधिक काळ राहिलेल्या व्यक्ती आहेत. त्या १९९८ पासून काँग्रेस अध्यक्षपदावर आहेत. मध्ये २०१७ आणि २०१९ मध्ये राहुल गांधींनी काँग्रेसाध्यक्ष पद सांभाळलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT