Mumbai Tak /बातम्या / Sharad Pawar: “छत्रपती शिवरायांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कुणीही केला नाही”
बातम्या राजकीय आखाडा

Sharad Pawar: “छत्रपती शिवरायांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कुणीही केला नाही”

छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेएवढा अन्याय दुसऱ्या कुणीही केला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राविषयी अर्धवट माहिती दिली त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचाही समावेश होतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या हस्ते श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बाबासाहेब पुरंदरे: ‘जाणता राजा’ कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी?

काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अर्धवट माहिती दिली. काहींनी धादांत खोटी माहिती दिली. श्रीमंत कोकाटे यांनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचं राज्य होतं, अशोकाचं राज्य होतं, यादवांचं राज्य होतं. मात्र शिवाजी महाराजांचं राज्य यापेक्षा वेगळं होतं. कारण त्यांचं राज्य कधीही भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा म्हणून ओळखलं गेलं.

Babasaheb Purandare: तरुणांच्या मनावर राज्य करणारे बाबासाहेब पुरंदरे कोण होते?

महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला आहे. ज्यांचा मातीशी संबंध आहे असा राजा म्हणजे कुळवाडी भूषण. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा त्यांचं संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय दुसऱ्या कुणीही केला नसेल. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का? याबाबत मी जास्त बोलू इच्छित नाही. मात्र हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार आधी दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार द्यायचे. २००८ मध्ये समिती सरकारने स्थापन केली. दादोजी कोंडदेव गुरू होते का याचा अभ्यास केला गेला. त्यातून असं समोर आलं की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू किंवा मार्गदर्शक नव्हते. तर जिजाबाई याच त्यांच्या मार्गदर्शक होत्या.

शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचं योगदान काय?

शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचं योगदान काय? असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला. शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिली त्या फक्त जिजाऊ माता होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी जे लिखाण आणि जी काही मांडणी केली ती मांडणी आणि तो इतिहास ज्याचा सत्यावर विश्वास आहे असा घटक कधीही मान्य करणार नाही. काही व्यक्तींचं महत्त्व वाढवण्यासाठी पुरंदरे यांनी विशेष काळजी घेतल्याचं दिसून येतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 8 =

कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम