सुषमा अंधारेंचा मोठा निर्णय; चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे दिला सरकारच्या समितीचा राजीनामा

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असं विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. या विधानावरून विरोधकांनी घेरल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत पाटलांच्या विधानाचा निषेध केलाय.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर सुषमा अंधारे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना आपला राजीनामा पाठवला आहे. सुषमा अंधारे आपल्या राजीनामा पत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे.

सुषमा अंधारे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवलेला राजीनामा…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray :…”तर लोकशाही देशातून संपली हे जाहीर करा आणि खोके…”

चंद्रकांत पाटील,

ADVERTISEMENT

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य

ADVERTISEMENT

विषय : आपल्या खात्याच्या अखत्यारित येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देण्याबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयी समितीच्या समूहावर मी माझे मत विस्तृतपणे नोंदवले आहे व एक पत्र आपले कार्यालयासही पाठवत आहे. तसेच हे पत्र समाज माध्यमावर सर्व चळवळीवर प्रेम करणाऱ्या बांधवांसाठी माहितीस्तव देत आहे.

‘…मग अमित शाह काय मध्यस्थी करणार आहे?’; बोम्मईंनी डिवचल्यानंतर संजय राऊतांचा संताप

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व मंडळी आमच्या जगण्याचे आदर्श आहेत. पण गेली काही महिने सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे.महामहीम राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते मंत्री, सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे.

समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या सतत विवेकाचा प्रश्न आहे, मात्र माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती. व सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती.

बेळगाव : आर. आर. पाटलांनी दाखवलेलं धाडस CM शिंदे करणार का? महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र

परंतु ही समिती उच्चतंत्र शिक्षण मंत्रालयाच्याच अखत्यारीत येते आणि जर याच खात्याचे मंत्री यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके हीन दर्जाचे विचार असतील तर समितीतील सदस्य पदापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्यासाठी लाख पटीने महत्त्वाचा आहे.

सबब आपण केलेल्या अक्षयपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ, मी या समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.

-सुषमा दगडूराव अंधारे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT