एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यात उद्धव ठाकरेंनी टाकला ‘डाव’! भाजप आमदाराच्या भावावर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर, सातारा

शिंदेंच्या बंडामुळे सरकार गेलं. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही गोठवला गेला. त्यामुळे शिंदेंसह 40 बंडखोर आमदारांना आस्मान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे जोराने तयारीला लागल्याचं दिसतं आहे. बंडखोरी केलेल्या आमदार-खासदारांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात ठाकरेंनी काम सुरू केल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या साताऱ्यात उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केलीये. शिंदे गटाला फाईट देण्यासाठी ठाकरेंनी भाजप आमदाराच्या सख्ख्या भावालाच मैदानात उतरवलंय.

सातारा जिल्ह्यात एकीकडे शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी भाजप आमदाराच्या भावाला पक्षात घेत नवा डाव टाकलाय. माण तालुक्याचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे लहान बंधू शेखर गोरे यांना शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महत्त्वाचं काम देण्यात आलंय. जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नितीन बानगुडे यांच्याकडून जबाबदारी काढून घेऊन शेखर गोरे यांच्याकडे देण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून सुरू होती. शेखर गोरे यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिल्यास पक्ष मजबूत होईल, असं पक्षाच्या नेत्यांना सांगितलं जात होतं. त्यानंतर आता शेखर गोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी सातारा जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवलीये. शेखर गोरे ठाकरेंच्या गटात गेल्यानं सत्ताधारी भाजप-शिंदे गट विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात चांगली लढत बघायला मिळू शकते, असं बोललं जातंय.

एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातच पडणार खिंडार? महेश शिंदे म्हणाले, ‘जेवत्या ताटावरून उठवलं गेलं, ते…’

ADVERTISEMENT

शेखर गोरे हे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. दोघांमधून विस्तव देखील जात नाही, इतकं राजकीय वैर जिल्ह्याने बघितलं आहे. यातच शिंदे गटाला लढत देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शेखर गोरे यांना मैदानात उतरवले आहे.

ADVERTISEMENT

शिंदेंच्या साताऱ्यात उद्धव ठाकरेंची रणनीती…

ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी सातारा हे त्यांचं होम पीच आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाला टक्कर द्यायची असेल, तर समोरचा शिवसैनिक तेवढ्याच तोडीचा हवा, हे उद्धव ठाकरे यांनी ओळखलंय. त्यामुळे नितीन बानुगडे यांना बाजुला करत सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून शेखर गोरे यांची नियुक्ती करण्यात आलीये. या निर्णयामुळे जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटात नवचैतन्य निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.

शेखर गोरे यांची सातारा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शेखर गोरे यांच्यात जिल्ह्यातील कोणत्याही बड्या नेत्याला लढत देण्याची ताकद आहे. त्यांची ही शक्ती ओळखून ठाकरेंनी हा निर्णय घेतला असावा. ठाकरेंचा हा डाव शिंदे गटाला जड जाऊ शकतो, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

Thackeray Vs Shinde : ‘हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी…’; खासदार प्रतापराव जाधवांचं चॅलेंज

शेखर गोरेंना आव्हान पेलवणार का?

जिल्ह्यात शिंदे गटाविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी शेखर गोरेंवर संर्पकप्रमुख पदाची जबाबदारी सोपवून ठाकरेंनी खेळी खेळल्याचं म्हटलं जातंय. आता शेखर गोरे एकनाथ शिंदे गटातील नाराजांना उद्धव ठाकरे गटात आणून पुन्हा ठाकरेंचं पारडं सातारा जिल्ह्यात जड करण्याचं शिवधनुष्य शेखर गोरे कसं पेलतात, हे पाहावं लागणार आहे.

सध्या तरी शेखर गोरेंच्या रुपानं उद्धव ठाकरे यांनी खेळलेला डाव हा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातोय. एकनाथ शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि उद्धव ठाकरेंनी शेखर गोरेंना दिलेलं सातारा जिल्हा संपर्कप्रमुख पद हे भविष्यातील राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरू शकतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT