Ind vs SL : पहिला दिवस भारताचा, पंतच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाची त्रिशतकी मजल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाअखेरीस त्रिशतकी मजल मारली आहे. ६ विकेटच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३५७ धावांपर्यंत मजल मारत स्वतःचं बाजू मजबूत केली आहे. ऋषभ पंतची आक्रमक फटकेबाजी आणि त्याला हनुमा विहारी, विराट कोहली, रविंद्र जाडेजा यांनी दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस ही मजल मारली आहे.

टॉस जिंकून कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना असल्यामुळे त्याला फलंदाजी करताना पाहण्यासाठी मैदानात प्रेक्षक उत्सुक होते. रोहित आणि मयांक जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनीही काही चांगले फटके खेळून पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लहिरु कुमाराच्या बॉलिंगवर लेग साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा २९ धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला.

यानंतर हनुमा विहारीच्या साथीने छोटेखानी भागीदारी करत मयांकने भारताचा डाव सावरला. भारताची ही जोडी फोडण्यासाठी लंकेने फिरकीपटू एम्बुलदेनियाला पाचारण केलं. एम्बुलदेनियानेही आपल्या कर्णधाराला नाराज न करता मयांक अग्रवालला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर विराट कोहलीने हनुमाच्या साथीने पहिल्या सत्रातली उर्वरित षटकं खेळून काढली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विराट आणि हनुमाची जोडी मैदानावर चांगली कामगिरी करत होती. हनुमाने संयमी खेळी करत आपलं अर्धशतकही साजरं केलं. ही जोडी लंकेला जड जाणार असं वाटत असतानाच एम्बुलदेनियाने विराटला क्लिन बोल्ड केलं. त्याने ४५ धावांची इनिंग खेळली. शंभराव्या कसोटी सामन्यात शतकी खेळीच्या अपेक्षेने मैदानात आलेल्या चाहत्यांची मात्र यावेळी निराशा झाली. यानंतर पाठोपाठ हनुमा विहारीही विश्वा फर्नांडोच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला, त्याने ५८ धावा केल्या.

शंभरावी कसोटी आणि विराट-सचिनची तुलना, कोहली मोडू शकेल का तेंडुलकरचा रेकॉर्ड?

ADVERTISEMENT

यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू धनंजय डी-सिल्वाने श्रेयसला माघारी धाडत भारताला पाचवा धक्का दिला. यानंतर ऋषभ पंतने आक्रमक पवित्रा आजमावत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. श्रीलंकेच्या बॉलर्सचा समाचार घेत ऋषभने सुंदर फटकेबाजी करत प्रतिस्पर्ध्यांना बॅकफूटवर ढकललं. आपल्या शतकापासून चार धावा दूर असतानाच ऋषभ पंत दुर्दैवी पद्धतीने लकमलच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला. त्याने आपल्या धडाकेबाज खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार लगावले.

ADVERTISEMENT

यानंतर आश्विन आणि जाडेजा यांनी उर्वरित षटकं खेळून काढत भारताची अधिक पडझड रोखली. श्रीलंकेकडून पहिल्या दिवसात एम्बुलदेनियाने २ तर लकमल, फर्नांडो, कुमारा, डी-सिल्वा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Ind vs SL : शतकी खेळीत विराट कोहलीचा विक्रम, परंतू शतकाची प्रतीक्षा अजुनही कायम

    follow whatsapp

    ADVERTISEMENT