महाराष्ट्रातल्या लसीकरणाचा ‘हा’ गोंधळ थांबणार कधी?
1 मार्चपासून देशभरात वयोवृद्धांसाठीच्या लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातही चार हजारांपेक्षा अधिक जणांना लस दिली गेली. मात्र महाराष्ट्रातल्या अनेक भागात आजच्या दुस-या दिवशीही निरनिराळ्या कारणांमुळे लसीकरणात अडथळे येत असल्याचं चित्र होतं. नवी मुंबई: मुळात कोविनमधील तांत्रिक बिघाडामुळे लसीकरणात दिरंगाई होत होतीच. त्यात नवी मुंबईत हॉस्पिटल्समध्ये लशीच पोहोचल्या नसल्याने लशीच्या चौकशीसाठी आलेल्यांच्या पदरी निराशा पडली. […]