शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे आणि बीडचे बडतर्फ करण्यात आलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात चांगलाच वाद झाला. जाधव यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांनी सुषमा अंधारेंना चापट मारली. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि आप्पासाहेब जाधव यांचं म्हणणं काय आहे, याबद्दल मुंबई Tak ने जाधव यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितलं.