मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. मात्र अधिवेशनातील आजचा दिवस हा पुन्हा एकदा राज्यपालांचे अभिभाषण, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक अशा विविध मुद्द्यांनी गाजत आहे. नेमकं काय घडतयं विधान सभा आणि विधान परिषदेत? (Maharashtra Budget Session live updates: The session is once again buzzing with various issues such as Governor’s address, Kasba and Chinchwad by-elections)
भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी अजित पवारांच्या समिती पुर्नगठीत करण्याच्या मागणीचा विरोध केला. समितीची नियुक्ती 100 टक्के कायदेशीर आहे. यात बेकायदेशीर काहिच नाही, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.
आज विधानसभेत या समितीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप नोंदवत, हक्कभंग समिती पुर्नगठित करण्याची मागणी केली होती. हक्कभंगाची नोटीस देणारे वादी आहेत आणि तेच समितीचे सदस्य म्हणून निर्णय घेतातय. त्यामुळे हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून होणार नाही, संसदीय कामकाज पद्धतीला धरून होणार नाही, त्यामुळे समिती पुर्नगठीत करावी अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे केली.