तुम्ही सकाळी काही गोष्टी खाताना काही पथ्ये ही पाळली पाहिजेत कारण त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि त्याचा त्रास तुम्हाला दिवसभर होण्याची शक्यता असते.
आयुर्वेदानुसार सकाळी कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने पचनशक्तीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो.
सकाळी जड, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळेही पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.
आयुर्वेदानुसार सकाळी दह्याचे सेवन केल्याने शरीरात श्लेष्मा तयार होतो आणि पचनामध्ये समस्या निर्माण होतात.
सकाळी कोशिंबीरसारख्या थंड आणि कच्च्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे, कारण त्याचा तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि पोषक तत्वांचे शोषण मंदावते.
सकाळी खूप गोड पदार्थ खाणे टाळावे. यांचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते. त्यामुळे दिवसभर थकवा आणि झोप येते.
सकाळी लोणचे किंवा व्हिनेगरने तयार केलेल्या वस्तूंचे सेवन अजिबात करू नका. त्यामुळे पित्तदोषाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते आणि पचनक्रियेतही समस्या उद्भवू शकतात.
दह्याप्रमाणेच सकाळी ताक पिल्याने त्याचाही पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो.
सकाळी आंबट फळे खाणे देखील तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.