तुम्ही खूपच फास्ट जेवता का? तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार
सध्याच्या दगदगीच्या आयुष्यात अनेक जण जेवायला खूप कमी वेळ देतात व जेवण लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात.
मात्र एका अभ्यासानुसार जे लोक पटकन अन्न खातात त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
तज्ज्ञांच्या मते, मेंदूला तुमचे पोट भरले आहे हे समजण्यासाठी किमान 5 ते 20 मिनिटे लागतात.
त्यामुळे जेव्हा तुम्ही पटकन अन्न खाता तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला हे सांगू शकत नाही की तुमचे पोट भरले आहे की नाही ते. त्यामुळे कधी कधी तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षाही जास्त खात असता.
जास्त वेळा अन्न खाल्ल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा सामना करावा लागतो. मेटाबॉलिक सिंड्रोममुळे लठ्ठपणा आणि रक्तदाब यासह अनेक आजारांचा धोका वाढतो.
पटकन अन्न खाल्ल्यामुळे लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. कारण तुमचा मेंदू तुम्हाला सांगू शकत नाही की तुमचे पोट भरले आहे आणि तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेता.
वारंवार खाल्ल्यामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. कारण खाण्याच्या घाईत तुम्हाला अन्न नीट चघळता येत नसते.
अन्न हळूहळू चघळल्याने जास्त इन्सुलिन सोडले जाते, ज्यामुळे तुमचे ग्लुकोज नियंत्रणात राहते. पण पटकन खाल्ल्याने इन्सुलिन निघत नाही.
पटकन अन्न खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि पचनाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.
PM Salary: ‘या’ देशांपैकी कोणत्या पंतप्रधानांना आहे सर्वाधिक पगार?